सिंचन विहिरींसाठी  त्रास झाल्यास करा तक्रार ः जयस्वाल
सिंचन विहिरींसाठी त्रास झाल्यास करा तक्रार ः जयस्वाल 
मुख्य बातम्या

सिंचन विहिरींसाठी त्रास झाल्यास करा तक्रार ः जयस्वाल

टीम अॅग्रोवन

यवतमाळ  ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरींसाठी अधिकारी, कर्मचारी त्रास देत असल्यास शेतकऱ्यांनी थेट तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्‍याम जयस्वाल यांनी केले. जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत ते बोलत होते. या सभेत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.  प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून २०१८-१९ या वर्षात ३९७ विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यांपैकी २१३ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. याकरिता २७ कोटी १८ लाख रुपये खर्च झाले. उर्वरित विहिरींचे कामे जलदगतीने करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी  विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे लाभार्थींना विचारात घेऊन विहिरींचे कामे करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.  वीज वितरणाकडून डिमांड दिल्या जात नसल्याच्या तक्रारी काही कृषी अधिकाऱ्यांनी सभेत केल्या. विशेष म्हणजे याबाबत वीज वितरण कंपनीला याबाबत पत्र सुद्धा देण्यात आले, परंतु वीज वितरणकडून कुठल्याही स्वरूपाचे पावले उचलली नसल्याची माहिती सभेत दिली गेली. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील २०१७-१८ मधील विहिरी पूर्ण झाल्या नाहीत. त्या योजनेचे सुद्धा पैसे शिल्लक आहेत. सर्वाधिक विहिरी नेर, दारव्हा तालुक्‍यात असल्याची माहिती समोर आली असून, उमरखेड तालुक्‍याने देखील यात आघाडी घेतली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा करण्यात आला. या योजनेचा काही निधी शिल्लक आहे. याचा उपयोग करून रब्बी हंगामात बियाणे पुरवठा शक्‍य आहे का? यावरही बैठकीत चर्चा झाली. या वेळी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे उपस्थित होते. भरपाईचा ठराव मंजूर काढणीच्यावेळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा ठराव कृषी समितीच्या सभेत मांडण्यात आला. त्याला मंजुरी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT