जरंडी, जि. सांगली ः पावसाचा खंड आणि त्यात पाणीटंचाईमुळे येथील द्राक्ष बागा अशा वाळू लागल्या आहेत. (छायाचित्र ः अभिजित डाके)
जरंडी, जि. सांगली ः पावसाचा खंड आणि त्यात पाणीटंचाईमुळे येथील द्राक्ष बागा अशा वाळू लागल्या आहेत. (छायाचित्र ः अभिजित डाके) 
मुख्य बातम्या

पाण्याविना द्राक्ष बागा वाळू लागल्या

Abhijeet Dake

सांगली ः पाणीटंचाई आणि पावसाचा खंड याचा फटका द्राक्ष पिकालाही बसू लागला आहे. तासगाव, जत, खानापूर तालुक्‍यातील द्राक्ष बागा पाण्याविना वाळू लागल्या आहेत.

द्राक्ष बागा जिवंत ठेवण्यासाठी द्राक्ष उत्पादकांची धडपड सुरू आहे. याचा फटका उत्पादनाला बसण्याची शक्‍यता आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे 1 लाख एकरवर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात पाण्याची टंचाई दिवसेंदिवस भीषण होत चाचली आहे. त्यातच पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे पाणी उपलब्ध करणे कठीण झाले आहे.

विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक मोठ्या विवंचनेत सापडला आहे. दुष्काळी पट्ट्यातील तासगाव तालुक्‍याचा पूर्व भाग, जत तालुक्‍याचा पूर्व आणि पश्‍चिम भागातील द्राक्ष शेती संकटात आली आहे.

पाण्याची टंचाई आणि पावसाची दडी यामुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे हाल सुरू आहेत. सध्या उपलब्ध होईल त्या पाण्यावर द्राक्ष शेती जिवंत ठेवण्याचे काम शेतकरी करत आहेत. तासगाव तालुक्‍यातील जरंडी, सावळज, सिद्धेवाडी, यमगरवाडी, वायफळे तसेच खानापूर तालुक्‍यातील पळशी गावांतील द्राक्ष बागा वाळू लागल्या आहेत.

जत तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती आहे. या ठिकाणी बेदाण्याचे उत्पादन घेतले जाते. पण या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नसल्याने द्राक्ष बागा वाळून गेल्या आहेत. सध्या शेतकऱ्यांनी फळ छाटणीचा विचारदेखील केला नाही. फळ छाटणी केली नाही तर बागा काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बागा जगविल्या पाहिजेत, यासाठी शेतकरी धडपडत अाहेत.

द्राक्ष बागेला पाणी उपलब्ध नाही. यामुळे सुमारे 10 किलोमीटरवरून पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी एका तासाला एक हजार रुपये मोजावे लागते आहे. पाण्याअभावी द्राक्ष पीक धोक्‍यात आले आहेत. - सुभाष गायकवाड, डफळापूर, ता. जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT