खारेपाटण गावाला पडलेला पुराचा वेढा
खारेपाटण गावाला पडलेला पुराचा वेढा 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्गात पूरस्थितीमुळे जनजीवन ठप्प

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दिवसागणिक पावसाचे प्रमाण वाढत असून, संततधारेमुळे पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. अनेक गावे, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. कित्येक गावांचा सपंर्क तुटला आहे. काही गावांना पुराच्या पाण्याने वेढले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गासह बहुतांशी मुख्य आणि ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुराच्या पाण्यातून वैभववाडीतील एक आणि कणकवली एक जण वाहून गेला आहे. पूरस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गात पावसाचा कहर सुरूच आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यातील खारेपाटण, बांदा, कसाल यांसह अनेक बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बांदा बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे तेथील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कसाल बाजारपेठेत पुराचे पाणी साचल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या गाड्या पाण्यात अडकल्या आहेत. 

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी नदी नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे शेकडो गावांचा तालुक्यांशी असलेला सपंर्क तुटला आहे. कुडाळ येथे पुराचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्यातील राज्य व ग्रामीण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कुडाळ तालुक्यातील भंगसाळ, हातेरी, पिठढवळ या नद्यांना पूर आल्यामुळे सिद्धार्थनगर, साईलवाडा, सांवतवाडा येथील घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.

वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथील एक जण तर कणकवली तालुक्यातील एक जण पुराच्या पाण्यातून वाहून गेला आहे. कोल्हापूर जोडणारे चारही घाटरस्यावरील वाहतूक ठप्पच आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा इतर तालुक्याशी सपंर्क तुटला आहे. आंबोली घाटामध्ये दरड कोसळली आहे. अनेक रस्त्यावर झाडे कोसळली आहेत. जिल्ह्यात पावसासोबत वादळाचा जोरदेखील कायम आहे. वादळामुळे पडझड सुरूच आहे. जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाल्यामुळे शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. पुरामुळे शेकडो एकर शेती, बागायती पाण्याखाली गेल्या आहेत. 

दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सावंतवाडी येथे सर्वाधिक ३७० मि.मी, वैभववाडी येथे २६०, कणकवली येथे २६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पुरामुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT