स्वच्छतेत सातारा देशात प्रथम
स्वच्छतेत सातारा देशात प्रथम 
मुख्य बातम्या

स्वच्छतेत सातारा देशात प्रथम

टीम अॅग्रोवन

सातारा : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत (ग्रामीण) झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वात स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन ऑक्‍टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे. हे पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे हे स्वीकारणार आहेत.

सातारा जिल्हा परिषदेने आजवर देश, राज्य पातळीवरील अनेक अभियानांत चमकदार कामगिरी केली आहे. निर्मल भारत अभियानामध्ये झेंडा रोवल्यानंतर सध्या स्वच्छ भारत अभियानातही (ग्रामीण) देशात झेंडा रोवला. यापूर्वी शौचालय बांधून हागणदारीमुक्‍त जिल्हा करण्यात देशात तृतीय, तर ओडिएफ जिल्हा करण्यात राज्य प्रथम क्रमांक मिळविला होता. आता स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळवून आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवला आहे.ऑगस्ट महिन्यात देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्रालयाने त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण केले होते.

त्यामध्ये स्वच्छतेची उपलब्धतेवर संख्यात्मक व गुणात्मक १०० गुणांचे सर्वेक्षण केले होते. सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेच्या निरीक्षणास ३० गुण, नागरिक, मुख्य प्रभावी व्यक्‍तीची स्वच्छतेबाबतची माहिती, मते व अभिप्रायास ३५ गुण व स्वच्छताविषयक सद्यःस्थितीला ३५ असे १०० गुणांकामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले. त्याबाबतचे पत्र केंद्रीय सहसचिव अरुण बरोका यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. या यशाबद्दल जिल्हा परिषद पदाधिकारी, प्रशासनाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT