पावसाची धास्ती कायम, पिके काढणीचे नियोजन कोलमडले
पावसाची धास्ती कायम, पिके काढणीचे नियोजन कोलमडले 
मुख्य बातम्या

पावसाची धास्ती कायम, पिके काढणीचे नियोजन कोलमडले

टीम अॅग्रोवन

नाशिक  : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड, चांदवड, येवला, नांदगाव, दिंडोरी, देवळा, बागलाण या तालुक्यांत सोंगणीसाठी आलेली पिके पावसामुळे नुकसानीच्या विळख्यात सापडली आहेत. प्रामुख्याने बाजरी, सोयाबीन, मका ही पिके आता सोंगणीसाठी आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या व्यत्ययामुळे सोंगणीची कामे थांबविली आहेत. मात्र जी पिके शेतात सोंगणी करून पडली आहेत. त्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.  संभाव्य पावसामुळे आणखी नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन तातडीने घरासमोरील खळ्यांवर कणसे वाहून आणण्याचे काम सुरू केले आहे. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.  पाऊस दररोज किंवा दिवसाआड होत असल्याने परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतातील उभ्या पिकाचे काढणीचे नियोजन करावे लागत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिके काढली असतील त्यांनी ती पावसापासून सुरक्षित ठिकाणी राहतील अशी काळजी घेण्यात येत आहे. या वर्षी संपूर्ण जिल्हाभर बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे या आठवड्यातही पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रामुख्याने पाऊस जर सुरू राहिला तर बाजरी व मक्याचा चारा खराब होऊन चारा कमी प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.  या पावसामुळे केलेली मेहनत वाया जाणार नाही यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसून येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT