सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर ः डॉ. बोंडे
सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर ः डॉ. बोंडे 
मुख्य बातम्या

सिंचन सुविधा बळकटीकरणावर भर ः डॉ. बोंडे

टीम अॅग्रोवन

अमरावती ः शेतकरी व सामान्यांच्या हितासाठी अनेक प्रभावी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सिंचन सुविधांच्या बळकटीकरणावर देखील सरकार भर देत असल्याने उत्पादकता वाढीस देखील यातून हातभार लागेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.  रविनगरस्थित भुतेश्‍वर चौक ते साईनगर या अंबादेवी पालखी मार्गाचे काँक्रिटीकरण व विद्युतीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, भाजप जिल्हाध्यक्ष संजय डेहनकर, तुषार भारतीय यांच्यासह प्रभागाचे नगरसेवक या वेळी उपस्थित होते. डॉ. बोंडे म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वर्षभरात सहा हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या रकमेचादेखील आधार होणार आहे. त्यासोबतच प्रधानमंत्री सिंचन योजनेतून देखील विदर्भासह राज्यातील अनेक प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास त्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता होत तो भाग सुजलाम सुफलाम होण्यास साहाय्य होईल. एका पाण्याअभावी पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. तशी वेळ येऊ नये जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली यावी, संरक्षित सिंचनाचे पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावे यावर देखील सरकारचा भर आहे. शहरी विकासासोबतच ग्रामीण भागात पूरक संसाधनांची उपलब्धता आणि शेतकरी हिताच्या प्रश्‍नांना लोकप्रतिनिधींनी प्राधान्य देत ते प्रश्‍न सोडवावे, असे आवाहनदेखील त्यांनी या वेळी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT