Earthquake
Earthquake 
मुख्य बातम्या

पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के 

टीम अॅग्रोवन

मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सातत्याने सुरूच आहे. बुधवारी रात्री पुन्हा पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यातील बहुतांश भाग सलग दोन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. 

सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट घोंगावत असताना भूकंपाच्या धक्क्यांनी पालघरकरांचा पिच्छा अजूनही सोडलेला नाही. बुधवारी रात्री ११ वाजून १९ आणि ११ वाजून ३९ मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले. हे धक्के तलासरी, धुंदलवाडी, आंबोली, आशागड, कासा, बोर्डी, बोईसर या भागात जाणवले. त्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीपोटी भूकंप प्रवणक्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामासाठी बाहेर स्थलांतरित झाले होते. मात्र सध्या राज्यात कोरोनाचे मोठे संकट असल्याने या भागातील सर्व नागरिक पुन्हा आपल्या गावात परतलेले आहेत. त्यातच हे काही काळ शमलेले संकट पुन्हा डोकं वर काढायला लागल्यामुळे येथील नागरिकांच्या मनात ह्या दुहेरी संकटामुळे मोठी भीती निर्माण झाली आहे. 

सातत्याने एकापाठोपाठ होणाऱ्या भूकंपांनी नागरिकांच्या मनात भीतीचे काहूर उठवले आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या भूकंपाने अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत, तर काही भिंती दुभंगण्याच्या स्थितीत आहेत. अशा जमिनी हादरवून सोडणाऱ्या भूकंपाने डोक्यावरील छत आणि घर कोसळले तर कुठे जायचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भूकंपाने स्थानिक नागरिक पुरते हैराण झाले आहेत. 

सध्या पालघर प्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात गुंतले असून पुन्हा भूकंप सत्र सुरू झाले असल्याने या भागाकडे कसे लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT