नवी दिल्ली ः शेतमालास किफायतशीर दर, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, आदी मागण्यांचे फलक हातात घेऊन सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.२१) येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
नवी दिल्ली ः शेतमालास किफायतशीर दर, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, आदी मागण्यांचे फलक हातात घेऊन सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.२१) येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले.  
मुख्य बातम्या

संपूर्ण कर्जमाफीसाठी दिल्लीत दुसऱ्या दिवशीही अांदोलन

वृत्तसेवा
नवी दिल्ली ः शेतमालास योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अार्थिक अडचणीत अाहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठविले अाहे. 
 
दरम्यान, देशातील १८४ शेतकरी संघटनांचा सहभाग असलेले अांदोलन दिल्लीत मंगळवारी (ता. २१) दुसऱ्या दिवशीही सुरू होते. सोमवारी (ता. २०) शेतकरी संघटनांनी किसान मुक्ती संसद घेऊन शेतमालास योग्य हमीभाव अाणि संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीचे ठराव मंजूर केले. दुसऱ्या दिवशीही अांदोलनात शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. 
 
शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदनही पंतप्रधानांना देण्यात अाले अाहे. सर्व शेतमालास किफायतशीर दर मिळावा, शेतमाल खरेदीची कार्यक्षम यंत्रणा अाणि बाजार हस्तक्षेपासाठी ठोस धोरण अाखावे. शेतकऱ्यांना सर्व कर्जापासून मुक्ती द्यावी अादी मागण्या निवेदनातून केल्या अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT