संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सिन्हा, पटोले, राजू शेट्टी, धोंडगे येणार एकाच व्यासपीठावर

टीम अॅग्रोवन

अकाेला : सरकारच्या धोरणांविरुद्ध सातत्याने टीका करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, खासदार राजू शेट्टी, खासदार नाना पटाेले, अामदार बच्चू कडू अाणि माजी अामदार शंकरअण्णा धाेंडगे हे पाच जण रविवारी (ता. ३ डिसेंबर) अकाेल्यात एकाच व्यासपीठावर येत अाहेत. शेतकरी जागर मंचाच्या पुढाकाराने ‘कापूस-साेयाबीन-धान’ (कासाेधा) परिषद होत आहे. या वेळी हे दिग्गज नेते सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तविली जात असून, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले अाहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतमालाला याेग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अार्थिक काेंडी झाली अाहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केली तरी अद्याप कुणालाही मदत मिळालेली नाही. त्यातच निसर्गाची अवकृपा अाणि सरकारच्या शेतकरीविराेधी धाेरणांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या अात्महत्या थांबलेल्या नाही.

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध अावाज उठविण्यासाठी शेतकरी जागर मंचाने दिग्गज नेत्यांना एकाच व्यासपीठावर अाणण्याचा या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केला अाहे. यातील सिन्हा व पटोले हे दोन नेते तर भाजपचे अाहेत. याशिवाय खासदार राजू शेट्टी, कडू अाणि धोंडगे हेही अामंत्रित करण्यात अालेले असून, पाच दिग्गज नेमके काय बोलतात याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या.

रविवारी सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत बस स्टॅंडशेजारील स्वराज्य भवन मैदानात ही ‘कासोधा’ परिषद होणार असून, शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे अावाहन शेतकरी जागर मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT