weather
weather  
मुख्य बातम्या

ढगाळ हवामानामुळे थंडी गायब

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती तयार झाली आहे. यामुळे राज्यातील गारठा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे मध्य कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात वादळी पाऊस व मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र, तर हिंदी महासागरात चक्रावाताची स्थिती तयार झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झाले आहे. परिणामी राज्यातील अनेक भागात पहाटेचा गारठा कमी झाला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ असल्याने गारठा कमी अधिक प्रमाणात आहे. सोमवारी (ता.२३) सकाळी निफाड आणि उस्मानाबाद येथे १२.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. 

दोन दिवसांपूर्वी हवामान काही प्रमाणात कोरडे झाल्याने राज्यात गारठा वाढला होता. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच घट होऊन दहा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले होते. मात्र, रविवारपासून (ता. २२) पुन्हा हवामान ढगाळ झाले आहे. सायंकाळी पुणे परिसरातील वाघोली, कोथरूड या भागात पावसाचे तुरळक थेंब पडले होते. नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात हवामान ढगाळ असल्याने गारठा कमी झाला आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, निफाड तालुक्याच्या परिसरात किंचित गारठा असल्याने तापमान बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. 

कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर परिसरात हवामान ढगाळ आहे. यामुळे काही प्रमाणात गारठा कमी झाला आहे. परिणामी किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असून किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. या भागात आणखी काही दिवस किमान तापमान असेच राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात गारठा चांगलाच कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमान १२ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानामुळे गारठा गायब झाला आहे. किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत होते. विदर्भातील अनेक भागात गारठा कमी झाला आहे. यामुळे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील तापमान १५ ते १८ अशं सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.  सोमवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला १७.९ (४), अलिबाग २२.५ (४), अमरावती १७.६ (३), औरंगाबाद १६.८ (५), बीड १८.८ (५), बुलढाणा १७.० (३), चंद्रपूर १५.२ (२), डहाणू २३.२ (५), गोंदिया १५.४(२), जळगाव १७.४ (६), कोल्हापूर १९.७ (५), महाबळेश्वर १५.५ (२), मालेगाव १८.५ (८), धुळे कृषी महाविद्यालय १३.०, मुंबई २२.२ (४), नागपूर १७.५ (३), नांदेड १५.० (३), नाशिक १७.२ (७), निफाड १२.४, उस्मानाबाद १२.४ (-१), परभणी १८.० (५), परभणी कृषी विद्यापीठ १७.५, लोहगाव १८.३ (७), पाषाण १७.३ (६), पुणे १६.९ (६), रत्नागिरी २३.९ (४), सांगली १९.१ (५), सातारा १९.५ (७), सोलापूर १९.० (३), ठाणे २२.१, वर्धा १८.६ (५), यवतमाळ १९.४ (५)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT