खानदेशात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण
खानदेशात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण 
मुख्य बातम्या

खानदेशात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात यंदा यंदा हिवाळ्यात थंडी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता पडलेली नाही. मध्यंतरी कोरडे वातावरण होते. आता पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले असून, उशिराच्या रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत चढउतार झाला आहे.  धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअसपर्यंत झाली होती. तर जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रातही दोन दिवस किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे. मागील हिवाळ्यात मोसमात खानदेशात किमान तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे चांगले उत्पादनही हाती आले होते. सिंचनासाठी पाण्याची गरजही कमी झाली होती. परंतु, यंदा मात्र किमान तापमान फक्त धुळे जिल्ह्यात काही दिवस पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. तर जळगाव जिल्ह्यात मात्र किमान तापमान या मोसमात आत्तापर्यंतदेखील सहा अंश सेल्सिअसखाली आलेले नाही. हिवाळ्यात अनेक दिवस ढगाळ वातावरण  होते. यामुळे थंडीचे प्रमाण या मोसमात कमी राहीले, असे जाणकारांचे मत आहे. मकर संक्रांतीनंतर थंडी वाढली होती. नंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे रब्बी पिके हवी तशी नाहीत.  ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका, ज्वारीवर अनेक भागांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असून, कोरड्या वातावरणाची गरज आहे. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर आहे. दुपारी सुसाट वारा सुटतो. सायंकाळी वारा कमी होतो. तर मध्यरात्रीनंतर गारवा वाढतो. पहाटे गारवा असतो. सुसाट वाऱ्यामुळे ज्वारी, गहू आडवा होऊन त्याचे अंशतः नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी फवारण्या करून घेत आहेत. आठवडाभरापासून ही स्थिती असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT