पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पालकमंत्री चंद्रकांत पाटील 
मुख्य बातम्या

सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांचे निर्णय पुण्यालाही लागू  : चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन

खेड शिवापूर, जि. पुणे  : ‘‘सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी जे शासन निर्णय काढले आहेत, ते सर्व शासननिर्णय पुण्यातही लागू होतील. आचारसंहितेचा भंग न करता या शासननिर्णयाची अंमलबजावणी केली जाईल,’’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. 

श्री. पाटील यांनी शुक्रवारी खेड शिवापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच, पुरात वाहून गेलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांची विचारपूस केली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर व योगेश टिळेकर, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव आदी या वेळी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, की पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यांच्या घरात राहण्यायोग्य स्थिती होईपर्यंत त्यांच्या निवारा, जेवण आणि आरोग्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खचलेले रस्ते आणि पूल यांच्या ताबडतोब दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियेचा कालावधी ४५ दिवसांवरून तीन दिवस करण्यात आला आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा  जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शुक्रवारी सकाळी खेड शिवापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी ते म्हणाले, की येत्या दोन दिवसांत पुराने झालेल्या सर्व नुकसानाचे पंचनामे करण्यात येतील. जे लोक बेपत्ता आहेत, त्यांचा अहवाल तयार करून शोध घेण्यात येईल. ‘एनडीआरएफ’च्या पथकामार्फत शोधकार्य सुरू ठेवण्यात येईल.'

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT