अशोक चव्हाण
अशोक चव्हाण  
मुख्य बातम्या

अपयश झाकण्यासाठीच शिवसेनेचा विमा कंपन्यांवर मोर्चा ः अशोक चव्हाण

टीम अॅग्रोवन

मुंबई ः राज्य सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना आपले कर्तव्य बजाविण्यात अपयशी ठरली आहे. सरकार म्हणून ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलेले नाहीत. आपले अपयश झाकण्यासाठीच शिवसेना विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याचा स्टंट करीत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केली. शिवसेनेने पीकविमा कंपन्यांच्या कार्यालयावर इशारा मोर्चा नेण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात बोलताना चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली. शेतकऱ्यांना पीकविम्याचा फायदा न मिळण्यासाठी या योजनेचे जाचक नियम आणि अटी कारणीभूत आहेत. शिवसेनेने हे निकष शिथिल करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता. मात्र, ते करण्याऐवजी शिवसेना मोर्चा काढून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्याचा खटाटोप करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. पीकविम्याचा प्रश्न गंभीर आहे. या योजनेत शेतकऱ्यांवर अन्याय होतो हे वास्तव आहे. पण, हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारमधील पक्षांनी शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेऊन कंपन्यांना भरपाई देण्यासाठी बाध्य केले पाहिजे. केवळ मोर्चा काढून काहीही होणार नाही, असे चव्हाण म्हणाले. जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी राज्यभरात पीककर्जाचे समाधानकारक वाटप नाही. शेतकऱ्यांना पावसाची आणि पेरणीसाठी पतपुरवठ्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सवंग प्रसिद्धीसाठी मोर्चा काढणाऱ्या सत्ताधारी पक्षाचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT