परभणी ः खरीप पीक विमा परताव्यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. ५) परभणी-गंगाखेड रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.(छायाचित्र ः योगेश गौतम)
परभणी ः खरीप पीक विमा परताव्यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता. ५) परभणी-गंगाखेड रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.(छायाचित्र ः योगेश गौतम)  
मुख्य बातम्या

पीकविमा परताव्यासाठी शिवसेनेचे चक्काजाम

टीम अॅग्रोवन

परभणी )ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या नुकसानीबद्दल विमा परतावा मंजूर करण्यात यावा. विमा कंपनीच्या बोगस कारभाराची चौकशी करावी. बोंड अळीमुळे तसेच गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावे आदी मागण्यांसह जिल्हा प्रशासन तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराविरोधात शनिवारी (ता. ५) शिवसेनेतर्फे परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

परभणी तालुक्यात परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगांव येथे परभणी-गंगाखेड रस्त्यावरील ब्राम्हणगांव येथे खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख डाॅ. संजय कच्छवे, रवींद्र पतंगे यांच्या उपस्थितीमध्ये चक्काजाम आंदोलनात शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पूर्णा तालुक्यात परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावर झिरो फाटा येथे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, गंगाखेड तालुक्यात गंगाखेड-लोहा रस्त्यावर, गंगाखेड, पालम येथे संतोष मुरकुटे यांच्या उपस्थितीत येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT