balaseheb patil
balaseheb patil 
मुख्य बातम्या

राज्यात बाजार समित्या सुरूच राहणार : सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील

टीम अॅग्रोवन

मुंबई: फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये आदी शेतमाल हा जीवनावश्यक असून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना पुरवठा सुरळीत व्हावा आणि ग्राहकांअभावी शेतीमालाचे नुकसान होऊ नये यासाठी या संकटकाळात बाजार समित्या बंद ठेवता येणार नाहीत. त्यासंबंधीचे निर्देश राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच फळे, भाजीपाला बाजारांचे सकाळी लवकर कामकाज संपल्यानंतर बाजार समित्यांची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात यावे असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले आहेत. मंत्री पाटील म्हणाले, की फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये आदी शेतमाल हा जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत येतो. तसेच सध्याच्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना या वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी बाजार समित्या सुरू ठेवणे आवश्यक आहे. दुसरीकडे ग्राहकांअभावी शेतीमालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे, ते सुद्धा टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज नियमितपणे सुरू राहावे, असे आदेश पणन संचालक कार्यालयाने सर्व बाजार समित्यांच्या प्रशासनाला दिले आहेत. ‘‘बाजार समित्या सुरू ठेवताना कोरोना विषाणूचा संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनाही करणे आवश्यक आहे. फळे, भाजीपाला बाजारांचे कामकाज सकाळी लवकर संपत असते, त्यानंतर बाजार समित्यांची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात यावे, त्यासाठी समित्या बंद ठेवणे योग्य होणार नाही,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

SCROLL FOR NEXT