परभणी येथे आंदोलन
परभणी येथे आंदोलन 
मुख्य बातम्या

दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत धरणे आंदोलन सुरू

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांसह जनतेच्या विविध मागण्यांसाठी परभणी जिल्हा दुष्काळ निवारण संघर्ष समितीतर्फे सोमवारपासून (ता.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. 

दुष्काळ निवारण संघर्ष समितीचे काॅम्रेड राजन क्षीरसागर, माणिक कदम, शेख जाफर, माधुरी क्षीरसागर आदींच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या

  • खरीप हंगाम २०१८ मधील सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद या पिकांची २५ टक्के अग्रीम नुकसानभरपाई पीकविमा योजनेमध्ये सहभागी शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. दुष्काळग्रस्त शेतक-यांना संपूर्ण पिकांची विमा नुकसानभरपाई देण्यात यावी.
  • जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे रब्बीतील उभी पिके तसेच चारा पिकांच्या उत्पादनासाठी आवर्तन सोडण्यात यावे.
  • माजलगांव प्रकल्पाच्या वरच्या धरणातून सोनपेठ, गंगाखेड तालुक्यातील लाभक्षेत्रात पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • निम्न दुधना प्रकल्पातून दोन आवर्तने तसेच नदी पात्रातील कोल्हापुरी बंधा-यांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.
  • गोदावरी नदीवरील डिग्रस उच्च पातळी बंधा-यातील पाणी पळविण्याचे प्रकार बंद करून लाभक्षेत्रातील शेतक-यांना पाणी वापराचे परवाने देण्यात यावेत.
  • मनरेगाअंतर्गत रोजगाराची मागणी केलेल्या मजुरांना तत्काळ किमान २०० दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा.
  • दुष्काळग्रस्त भागात पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी.
  • सर्वाच्या हातांना काम आणि रेशन यासह दुष्काळ निवारणासाठीच्या १३  सुविधांची अंमलबजावणी करावी.
  • दुष्काळग्रस्तांना खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

    Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

    Cotton Market : कापूस का काळवंडला?

    Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

    Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

    SCROLL FOR NEXT