युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या : अनिल घनवट
युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या : अनिल घनवट 
मुख्य बातम्या

युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या : अनिल घनवट

टीम अॅग्रोवन

नगर  : युती सरकारच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोचली नाही. दुष्काळ, महापुराने शेतकरी त्रस्त आहेत. तंत्रज्ञान स्वातंत्र्य मागणाऱ्या शेतकऱ्यांवर खटले दाखल केले आहेत, असा आरोप शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी केला.  

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने शरद जोशी यांच्या जयंतीच्या दिवशी (मंगळावारी) नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. आंदोलनात बापूसाहेब आढाव, संजय तोरडमल, विक्रम शेळके, महादेव खामकर, इंदूबाई ओहोळ, नानासाहेब जाधव, शिराज शेख, अनिल भुजबळ, अंबादास चव्हाण, कारभारी कणसे, डाॅ. संजय कुलकर्णी, बाबासाहेब म्हसे, संजय करपे, अंबादास चव्हाण, साहेबराव सोमवंशी, कांतिलाल माळवदकर, बन्सी इंगळे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. 

या वेळी श्री. घनवट म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाबरोबरच अतिवृष्टी व महापुराला तोंड दिले आहे. अनेक वर्ष शेतकरी नापिकीला सहन करत आहे. जे पिकले त्याला भाव मिळालेला नाही. कर्ज फेडणेच काय प्रपंच चालवणेसुद्धा शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही वर जमिनींचे लिलाव पुकारून सक्तीने वसुली करणे सुरू आहे. राज्यभर तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी आंदोलन झाले मात्र सरकार त्याची दखल घेत न‍ाही. सर्व शेतीमाल नियमनमुक्त करण्याच्या फक्त घोषणाच होतात, प्रत्यक्ष कार्यवाही होताना दिसत नाही. वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हवालदिल आहेत व अनेक वर्ष झगडत असलेल्या वननिवासींना जमिनी मिळण्यास सरकारी नियम आडवे येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT