शेतकरी हिताच्या पाठीशी ३२ विरोधी पक्ष; १९३ शेतकरी संघटना
शेतकरी हिताच्या पाठीशी ३२ विरोधी पक्ष; १९३ शेतकरी संघटना 
मुख्य बातम्या

शेतकरी हिताच्या पाठीशी ३२ विरोधी पक्ष; १९३ शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली जाणार आहे. या अधिवेशनात शेतकरी हिताची दोन विधेयके मांडली जाणार असून, या विधेयकांना देशभरातील ३२ विरोधी पक्षांसह १९३ शेतकरी संघटनांचा पाठिंबा असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आता मरायचं नाही लढायचं म्हणत शेतकरी सन्मान अभियान राबविले जात आहे. राज्यातील १४ जिल्ह्यात राबविल्या जाणारे हे अभियान शुक्रवारी (ता. ४) औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाले. यावेळी खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. शेट्टी म्हणाले, मे महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशन बोलविण्यासाठी येत्या १० मे रोजी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा हजार लोक आम्ही मागणी करीत असलेले अधिवेशन बोलवले जावे यासाठी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. या अधिवेशनात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीवर अंमलबजावणीसह संपूर्ण कर्जमुक्‍ती व इतर आवश्‍यक विषयांची दोन बिले सादर केली जातील. या विधेयकांना ३२ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राज्यसभेत कॉम्रेड राकेशजी व लोकसभेत आपण स्वत: ही विधेयके मांडणार आहोत. या विधेयकांच्या निमित्ताने नेमके शेतकऱ्यांच्या बाजूने कोण हे आपल्याला पहायचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT