2 crore tons of sugarcane crushed in Marathwada
2 crore tons of sugarcane crushed in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात सव्वादोन कोटी टन ऊस गाळप

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या गाळप हंगामात सहभागी कारखान्यांनी १३ मार्चपर्यंत २ कोटी २३ लाख ३३ हजार ५०८ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २ कोटी २३ लाख ८२ हजार २९० क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्‍क्‍यांपुढे आहे. तर उस्मानाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १० टक्‍क्‍यांच्या आतच आहे. ५९ कारखान्यांपैकी ३६ कारखाने दैनंदिन गाळप क्षमतेच्या पुढे उसाचे गाळप करीत आहेत.

यंदाच्या ऊस गाळप हंगामात आजवर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १३, त्यापाठोपाठ लातूरमधील १०, औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी ७, परभणी व नांदेडमधील प्रत्येकी ६, हिंगोली व जालनामधील प्रत्येकी ५ कारखान्यांनी सहभाग नोंदविला आहे. १३ मार्चपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २० लाख १ हजार २९८ टन, जालन्यातील ५ कारखान्यांनी १८ लाख ९६ हजार ३४३ टन, बीडमधील ७ कारखान्यांनी २९ लाख २८ हजार ८७ क्‍विंटल,  उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी ५१ लाख ८६ हजार ८७५ टन उसाचे गाळप केले. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ३९ लाख ६५ हजार २१८ टन, परभणी जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी २८ लाख ५४ हजार ९२६ टन,  हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी १६ लाख २३ हजार ९८७ टन, नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १८ लाख ७६ हजार ७७४ टन उसाचे गाळप केले. 

३६ कारखान्यांकडून क्षमतेहून जास्त गाळप

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ८, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेडमधील प्रत्येकी ३, तर परभणी व हिंगोलीतील प्रत्येकी ५ व लातूरमधील ६ कारखान्यांनी क्षमतेहून अधिक गाळप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Season : खरिपात तूर, कपाशी, हळद क्षेत्रवाढीचा अंदाज

Sludge Issue : गाळयुक्‍त खाडीमुळे चिरनेरवासी त्रस्‍त

Dam Water Stock : धरणांच्या पाणीपातळीत घट

Uttarakhand Forest Fire : सर्वोच्च न्यायालयाच्या कानउघडीनंतर थेट १० जणांचे निलंबन; ७ वननिरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Agrowon Sanvad : चांगल्या कापूस उत्पादनासाठी एकात्मिक कीडनियंत्रण करावे

SCROLL FOR NEXT