मराठवाड्यातील प्रकल्पांत उरले १.६३ टक्के पाणी
मराठवाड्यातील प्रकल्पांत उरले १.६३ टक्के पाणी  
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील प्रकल्पांत उरले १.६३ टक्के पाणी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ १.६३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या ११ प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. गोदावरी, तेरणा, रेणा, मांजरा नदीवरील ३७ बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंब शिल्लक नाही. मांजरा, तेरणा, रेणा नदीवरील २४, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यातील उपयुक्‍त पाणी संपले आहे. ३०७ लघू व २८ मध्यम मिळून ३३५ लघू-मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

मध्यम प्रकल्प स्थिती

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी १२ कोरडे आहेत. ४ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी ३ कोरडे, तर ४ मधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल १० प्रकल्प कोरडे, तर ५ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे.

लातूरमधील ८ पैकी एक प्रकल्प कोरडा, ४ प्रकल्पांतील साठा जोत्याखाली आहे. उस्मानाबादमधील १७ पैकी ९ कोरडे, तर ६ मधील पाणीसाठा जोत्याखाली, नांदेडमधील ९ पैकी ३ प्रकल्पांतील साठा जोत्याखाली, परभणीतील दोन्ही प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. बीडमधील १, लातूरमधील ३, उस्मानाबादमधील २ व नांदेडमधील ६ मध्यम प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. 

लघू प्रकल्पांत साठा आटला मराठवाड्यात ७४९ लघू प्रकल्प आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ पैकी ७२ कोरडेठाक, १० प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहेत. उरलेल्या ११ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणी आहे. जालन्यातील ५७ पैकी ५१ प्रकल्प कोरडा, ४ प्रकल्प जोत्याखाली, उरलेल्या २ प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाणी आहे. बीडमधील १२६ लघू प्रकल्पांपैकी ८९ प्रकल्प कोरडे पडले आहेत. २९ प्रकल्प जोत्याखाली आहेत. ६ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, २ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान पाणीसाठा आहे.

लातूर जिल्ह्यातील १३२ पैकी ४१ कोरडे, ७९ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली आहे. ११ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, तर १ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान पाणीसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ प्रकल्पांपैकी १०८ कोरडेठाक पडले आहेत. ७५ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. २० प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, तर २ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान पाणीसाठा आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ८८ पैकी ६८ मधील पाणीसाठा जोत्याखाली, १७ प्रकल्पात २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी, तर ३ प्रकल्पांत २५ ते ५० टक्‍क्‍यांदरम्यान पाणीसाठा आहे. परभणीतील २२ पैकी १९ प्रकल्पात पाणीसाठा जोत्याखाली, हिंगोलीतील २६ पैकी २३ प्रकल्पातील पाणी जोत्याखाली आहे. 

मोठ्या प्रकल्पांची स्थिती दयनीय

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी १० प्रकल्पांत उपयुक्‍त पाणी नाही. त्यामध्ये जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, उर्ध्व पैनगंगा, निम्न तेरणा, विष्णूपुरी, निम्न दुधना, सिनाकोळेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT