पंचनाम्यापासून १५ हजार हेक्टर क्षेत्र वंचित
पंचनाम्यापासून १५ हजार हेक्टर क्षेत्र वंचित 
मुख्य बातम्या

पुणे : पंचनाम्यापासून अद्यापही १५ हजार हेक्टर क्षेत्र वंचित

टीम अॅग्रोवन

पुणे ः पुणे जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे धीम्या गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नसून सुमारे १५ हजार २२ हेक्टर क्षेत्र पंचनाम्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे पंचनामे कधी पूर्ण होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे भात, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात गावपातळीवर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांचे कामाचे स्वरूप व रिक्त असलेल्या जागा विचारात घेता जिल्ह्यात नुकसानीचे धीम्या गतीने पंचनामे सुरू आहेत. आत्तापर्यंत (ता. ९) जिल्ह्यात ८३ हजार ७०५ हेक्टरवर पंचनामे झाले आहेत.

यंदा पुणे जिल्ह्यात सुमारे तीन लाख ६ हजार ६८३ हेक्टरवर पेरणी झाली होती. ऐन काढणीच्या अवस्थेत असताना जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ४५४ गावांतील सुमारे एक लाख ५८ हजार ९६९ शेतकऱ्यांना फटका बसला असून, या गावातील पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार तातडीने पंचनामे सुरू केले असले, तरी अनेक भागांत अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत.

पावसाचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्याला बसला आहे. सुमारे १८४ गावांतील ५६ हजार ५२३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात जवळपास ३५ हजार ५८५ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी २७ हजार ५१३ हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. उर्वरित शिरूर, खेड, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांतही पंचनामे वेगाने सुरू असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा कृषी विभागाच्या प्रशासनाला आहे.पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पंचनामे करण्याचे राहिले आहेत.

पंचनाम्यापासून दूर राहिलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र
हवेली ७०२.४४
मुळशी ५६.९९
भोर ६९.३६
मावळ १३४३.५६
वेल्हा १६७.१०
खेड २१०२.१५
आंबेगाव ३३०६.१८
शिरूर ४१९.८८
बारामती ७२१.९५
इंदापूर ८०६.४१
दौंड २२७१.६०
पुरंदर ३०५५.१२
एकूण १५०२२

जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. आत्तापर्यंत ८० ते ९० टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित पिकांचेही पंचनामे आठवडाभरात पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.   - बी. जे. पलघडमल,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT