Orange  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange Market : संत्रा फळांनी गाठला ५५ ते ६० हजारांचा टप्पा

Orange Rate : मृग बहर संपल्यात जमा असल्याने अखेरच्या टप्प्यातील संत्रा फळांचे दर चांगलेच तेजीत आले आहेत.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : मृग बहर संपल्यात जमा असल्याने अखेरच्या टप्प्यातील संत्रा फळांचे दर चांगलेच तेजीत आले आहेत. सरासरी ५५ ते ६० हजार रुपये असा दर मृग बहरातील संत्रा फळांना मिळत असल्याची माहिती नव्या संत्रा प्रक्रिया केंद्राचे संचालक नीलेश रोडे यांनी दिली.

जानेवारी ते मार्च असा मृग बहरातील संत्र्याचा कालावधी राहतो. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी आहेत, असेच शेतकरी या बहरातील संत्रा फळांचे व्यवस्थापन करतात. त्यामुळेच या बहरातील संत्रा फळांचा दर्जा तसेच चांगला राहत असल्याने आंबट गोड चवीच्या या संत्रा फळांना ग्राहकांची मागणी राहते, असा अनुभव आहे. मृग बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील मर्यादित आहे.

परिणामी या हंगामातील फळांची उपलब्धता देखील कमीच राहते. त्यामुळेच मृगाच्या फळांचे दर सहसा तेजीतच राहतात. मात्र गेल्या दोन वर्षात बांग्लादेशकडून आयात शुल्कात ८८ टक्‍का (भारतीय चलनात प्रतिकिलो ६६ रुपये) अशी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बांग्लादेशची निर्यात प्रभावित झाल्याने देशाअंतर्गत बाजारातच संत्रा विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. याच कारणामुळे देशाअंतर्गत बाजारात मृग बहरातील संत्रा फळांचे दरही घटले.

जानेवारीपासून मृग बहराचा हंगाम सुरू होतो. यंदा सुरुवातीच्या काळात ३० ते ३२ हजार रुपये टन असे दर होते. त्यानंतरच्या काळात बाजारात उठाव नसल्याने फेब्रुवारीमध्ये हे दर १५ ते २० हजार रुपये टनापर्यंत खाली आले, असे नीलेश रोडे यांनी सांगितले. मार्च अखेर किंवा जास्तीत जास्त एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या हंगामातील फळांची उपलब्धता होते.

त्यातच मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने संत्र्याचे दर तिपटीने वाढत ५५ ते ६० हजार रुपये प्रतिक्‍विंटलवर पोहोचले आहेत. प्रक्रिया उद्योगाची लहान आकाराच्या फळांची मागणी राहते. त्याचे दरही १३ ते १५ हजार रुपयांवर असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आता सप्टेंबरमध्येच आंबीया बहारातील फळांची उपलब्धता होणार आहे.

बांगलादेश हा नागपुरी संत्र्यांचा सर्वांत मोठा आयातदार आहे. परंतु त्यांनी आयात शुल्कात मोठी वाढ केली. परिणामी निर्यात प्रभावित झाली आहे. हंगामात रोज सरासरी दोन लाख किलो फळांची निर्यात पूर्वी होत होती. ती आता ५० हजारांपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे देशाअंतर्गत बाजारातच ही फळे विक्रीसाठी जात असल्याने दर दबावात होते. आता हंगाम संपल्याने दर तेजीत येत ५५ ते ६० हजार रुपये टनांवर पोहोचले आहेत.
- नीलेश रोडे, संचालक, नव्या संत्रा प्रक्रिया केंद्र, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT