Red Chilli Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast: लाल मिरची उत्पादनात घट; मागणी मात्र वाढली

Team Agrowon

१) सोयाबीन बाजारात चढ उतार (Soybean Market)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन (Soybean) आणि सोयापेंडच्या दरात (Soyameal Rate) चढ उतार पाहायला मिळाले. पण सरासरी दरपातळी कायम आहे. दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.१६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४६० डाॅलरची पातळी गाठली.

देशात मात्र सोयाबीन बाजार (Soybean Market) आजही स्थिर दिसला. सोयाबीनची सरासरी आवक दोन लाख टनांच्या दरम्यान आहे. तर सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ४५० रुपये होती. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर सोयाबीन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दर स्थिरावले (Cotton Rate)

कापसाची दरपातळी आज देशातील बाजारातील स्थिर होती. कापसाला सध्या सरासरी ७ हजरा ८०० ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळतोय. सध्या कापूस आवकेचा दबाव असल्याने दरवाढीवरही दबाव असल्याचं सांगितलं जातं.

बाजारात दैनंदीन सव्वा ते दीड लाख गाठी कापसाची आवक होते, असे व्यापारी आणि उद्योगांकडून सांगण्यात आले.

पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील कापूस आवक कमी होणार आहे. त्यावेळी कापसाच्या दरात तेजी येईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

३) तुरीतील तेजी कायम

तुरीच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ८ हजार ८०० रुपये दर मिळतोय. बाजारातील आवक कमी असल्यानं दरावर दबाव नाही. मात्र दुसरीकडे सरकार बाजारावर दबाव टाकत आहे.

पण कमी उत्पादन, शेतकऱ्यांची मर्यादीत विक्री आणि कायम असलेली मागणी यामुळं तुरीच्या दरावर सरकारच्या धोरणांचा परिणाम होताना दिसत नाही. तुरीचे दर पुढील काळातही टिकून राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.

४) हरभरा भाव दबावातच

हरभरा बाजाराला सध्या नाफेडच्या खरेदीचा आधार मिळताना दिसतोय. नाफडेच्या खरेदीमुळे बाजारातील आवकही कमी आहे. बाजारात येणारा हरभरा प्रक्रियेसाठी जातोय. स्टाॅकिस्ट सध्या बाजारात सक्रीय दिसत नाही.

सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये भाव मिळतोय. नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर काही काळ बाजारात आवकेचा दबाव येऊ शकतो. पण दीर्घकाळात हरभरा बाजार टिकून राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) लाल मिरचीचे दर कसे राहतील?

देशातील बाजारात गेल्या काही दिवसांपासून लाल मिरचीच्या दरात मोठी तेजी आहे. यंदा देशातील लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली. गेल्या हंगामात देशात १८ लाख ३० हजार टन उत्पादन होते. मात्र यंदा पाऊस आणि कीड-रोगामुळं मिरची उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं शेतकरी सांगत आहेत.

महत्वाच्या मिरची उत्पादक आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसामुळे पिकाचे नुकसान अधिक आहे. तसचं गेल्या हंगामातील शिल्लक साठा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. दुसरीकडे बांगलादेश, चीन आणि युएईला निर्यात जास्त झाली.

निर्यातीसाठीच्या तेजा, बॅडगी, गुंटूर सन्नालू या वाणांना तब्बल ३० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळतोय. इतर वाणांच्या मिरचीलाही सरासरी २० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. दर तेजीत असल्याने देशातील मिरची पावडर उद्योग दरात नरमाई येण्याची वाट पाहत आहेत.

पण देशात सध्या लाल मिरचीची उपलब्धता कमीच दिसते. त्यातच चीन, बांगलादेश, इंडोनेशिया आणि व्हिएतनामकडून मिरचीला मागणी वाढत आहे.

त्यामुळे निर्यातही जोमात सुरु राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मरचीच्या दरातील तेजी आणखी वाढू शकते, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापारी आणि निर्यातदारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT