Green Chilli Agrowon
मार्केट बुलेटीन

Green Chilli : हिरव्या मिरचीची आवक कशी सुरु आहे?

Green Chilli Rate : सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पावसाने मिरची पिकाला मोठा तडाखा दिला.

अनिल जाधव

Market Bulletin : कापसाच्या भावावरी दबाव अद्यापही कायम आहे. कापसाचा सरासरी भाव आजही ७ हजारांच्या दरम्यान होता. तर बाजारातील आवक सरासारीऐवढी होत आहे. बाजारातील आवक आणि उठाव पाहता दरावर दबाव दिसून येत आहे. वायद्यांमध्येही कापसाचे भाव नरमले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावावरील दबाव दिसून येतो.

कापडाला उठाव कमी असल्याने ही स्थिती असल्याचे जाणवते. कापूस सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयाने विकला जात आहे. कापूस भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीनच्या भावावरील दबावही कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात काहिशी वाढ झाली. पण अपेक्षित वाढ नव्हती. देशातील बाजारात आजही सायंकाळपर्यंत दरात काहिशी नरमाई होती. सोयाबीनचा भाव ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते.

तर प्रक्रिया प्लांट्सनी आजही खरेदीचे भाव ५० रुपयाने कमी केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड काहिसे सुधारल्याने काहिसे सकारात्मक वातावरण होते. पण बाजाराला एकूणच सुधारणेची प्रतिक्षा आहे. सोयाबीनच्या भावात आणखी काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आल्याच्या भाव काही दिवसांपासून नरमाईलेले आहे. आल्याचे नवे पीक पुढील एक ते दीड महिन्यात सुरु होईल. नवा माल बाजारात येण्याच्या आत मागील माल विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच नफावसुलीसाठी आल्याची विक्री झाली. तरीही बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. पण वाढलेल्या भावात आल्याचा उठाव कमी झाला होता.

त्यामुळे आल्याचे भाव आता ७ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान आले. यंदा नव्या आले पिकाला कमी पावसाचा फटका बसला. तसेच बदलत्या वातावरणाचाही फटका आले पिकाला बसत आहे. परिणामी आल्याचे उत्पादन यंदाही कमी राहू शकते, असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

भारतात सध्या तुरीची टंचाई आहे. बाजारात तुरीचा पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत. आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये तुरीचा स्टाॅक आहे. पण येथून येणारी आयात थांबली आहे, तर इतर जास्त भावाच्या अपेक्षेने भारताला कमी प्रमाणात तूर पाठवत आहे. देशात सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे.

परिणामी देशात तुरीचा पुरठा कमीच आहे. त्यातही यंदा तूर लागवड कमी आहे. दुष्काळामुळे उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे तुरीचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

बाजारात हिरव्या मिरचीच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचे दिसते. बाजारातील आवक स्थिर आहे. काही बाजारात आवक वाढल्याने दरात नरमाई देखील दिसून आली. सध्या हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पावसाने मिरची पिकाला मोठा तडाखा दिला.

अनेक भागात पीक आडवे झाले. त्यामुळे हा माल बाजारात येत आहे. पण पुढील काळात पिकसाठी पुरेशे पाणी अनेक भागात उपलब्ध नसेल. परिणामी बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काळात हिरव्या मिरचीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT