२०१५-१६ या वर्षात देशातील शेतकरी कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ रुपयांवर पोचल्याचे दिसत असले तरी त्यापैकी ५२ टक्के कुटुंबं कर्जबाजारी अाहेत, असे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेने (नाबार्ड) केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणासाठी ४० हजार ३२७ कुटुंबांची माहिती घेण्यात आली. देशातील ग्रामीण कुटुंबांमध्ये शेतकरी कुटुंबांची संख्या ४८ टक्के आहे. या शेतकरी कुटुंबांना २०१५-१६ या वर्षात पीक लागवड, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, बिगर शेती क्षेत्रातील रोजगार आणि रोजंदारी, मजुरी या स्राेतांमधून वार्षिक सरासरी उत्पन्न १ लाख ७ हजार १७२ रुपये मिळाले. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने (एनएसएसओ) २०१२-१३ या वर्षासाठी केलेल्या सर्वेक्षणानुसार शेतकरी कुटुंबांचे वार्षिक सरासरी उत्पन्न ७७ हजार ११२ रुपये होते. नाबार्ड आणि एनएसएसओ यांच्या सर्वेक्षणांची तुलना करता २०१२-१३ च्या तुलनेत २०१५-१६ वर्षात शेतकरी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नात १२ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते. नाबार्डने केलेल्या सर्वेक्षणात शेतकरी कुटुंबामधील कर्जबाजारीपणाचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले आहे. सुमारे ५२.५ टक्के शेतकरी कुटुंबं कर्जबाजारी असल्याचे आढळून आले. बिगरशेतकरी कुटुंबांचा विचार करता ४२.८ कुटुंबं कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाले. नाबार्डच्या या सर्वेक्षणासाठी देशातील २९ राज्यांतील २४५ जिल्ह्यांतील २०१६ गावांमध्ये जाऊन माहिती घेण्यात आली. एकूण १ लाख ८७ हजार ५१८ लोकांची माहिती संकलित करण्यात आली. नाबार्डच्या सर्वेक्षणातील माहिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.