Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market Rate : कापूस भावावर ३ घटकांचा दबाव; कापूस भाव दबावात असल्याने लागवड घटण्याचा अंदाज

Market Rate : एकेकाळी शेतकऱ्यांचं पांढरं सोन असलेला कापूस आता शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरतोय. आजही सात ते आठ महिने चांगल्या भावासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांना मनाप्रमाणे भाव मिळत नाही.

Anil Jadhao 

Pune News : एकेकाळी शेतकऱ्यांचं पांढरं सोन असलेला कापूस आता शेतकऱ्यांसाठी तोट्याचा ठरतोय. आजही सात ते आठ महिने चांगल्या भावासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांना मनाप्रमाणे भाव मिळत नाही. ऐन लागवडीच्या काळातही ही परिस्थिती असल्याने यंदा शेतकरी कापसाची लागवड कमी करतील, असा अंदाज लावला जात आहे. आधीच उत्तर भारतातील कापूस लागवड ३२ टक्क्यांनी कमी झाली. आता राज्यातही कापूस लागवड कमी होईल, असा अंदाज कृषी विभागाने दिला. 

कापसाचे भाव देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून एका भावपातळीच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या भावावर दबाव कायम आहे. कमी झालेली मागणी आणि दुसरीकडे बाजारातील विक्री यामुळे भावावर दबाव आल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे काही जणांच्या मते, जागतिक बाजारातील काही घटक विचारात घेऊन सट्टेबाजी सुरु आहे. सध्या बाजारात पुढच्या हंगामात जास्त उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ब्राझीलमध्ये उत्पादन वाढल्याचाही परिणाम सांगितला जातो. बाजारातील अनिश्चित परिस्थितीमुळे दर मात्र निचांकी पातळीवर पोचले.

जून महिना तसा कापसासाठी ऑफ सिझन समजला जातो. पण तरीही बाजारातील आवक ३५ ते ४० हजार गाठींच्या दरम्यान आहे. तर पुढे रुई आणि सुताला उठाव नसल्याचे जिनिंग आणि सुतगिरण्यांडून सांगितले जात आहे. पण जिनिंग कमी भावात रुई विकण्यास इच्छूक दिसत नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चित परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे दरवाढीसंदर्भात काही वेळा परिस्थिती दिसत असूनही प्रत्यक्षात तसे घडले नाही. जून महिन्यातही शेवटच्या आठड्यात अशी परिस्थिती सांगितली जाते. 

दुसरीकडे ऐन लागवडीच्या काळात उत्पादन घटल्यानंतरही कापसाचे भाव दबावातच आहेत. तर दुसरीकडे कडधान्य आणि धान्य पिकाचे भाव बरे आहेत. त्यामुळे शेतकरी यंदा या पिकांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील कापूस लागवड ५ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज राज्याच्या कृषी विभागाने व्यक्त केला.  

उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी आधीच लागवड ३२ टक्क्यांनी कमी केली. यात पंजाबमधील लागवड सर्वाधिक ४५ टक्क्यांनी घटली आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळी, पांढरी माशीमुळे घटणारे उत्पादन आणि कमी झालेला बाजारभाव यामुळे कापसाकडे पाठ फिरवली. केवळ उत्तर भारतातच नाही तर सगळीकडे सध्या हे चित्र कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. 

उत्तर भारतातील शेतकऱ्यांना इतर पिकांचा पर्याय आहे. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्त पर्याय नाहीत. शेतकरी कापसाकडून सोयाबीनकडे वळाले. पण सोयाबीनचे भाव यंदा हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे राज्यात कापसाचा पेरा उत्तर भारताप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता दिसत नाही. क्षेत्र काही प्रमाणात  कमी होण्याची शक्यता आहे. 

कापूस उत्पादकांना सर्वाधिक अडचण आहे ती मजुरांची. ऐन कापूस वेचणीच्या काळात मजूर मिळत नाहीत. मजुरी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. तसेच पावसानेही नुकसान होत असते. यंदा तर शेतकऱ्यांना कापूस बियाणे मिळविण्यापासून कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा लागवडीवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होणार हे नक्की. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT