पिकांच्या ओळींमध्ये जलसंधारणासाठी सरी पाडाव्यात.
पिकांच्या ओळींमध्ये जलसंधारणासाठी सरी पाडाव्यात.  
कृषी सल्ला

आंतरमशागत करा, संरक्षित पाणी द्या

डॉ. भगवान आसेवार, डॉ. मदन पेंडके

सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत आहे. पाण्याचा ताण कमी करण्यासाठी तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३ः००ः४५) २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर ३५ दिवसाने प्रत्येक चार ओळी किंवा तासानंतर एक जलसंधारण सरी बळिराम नांगराच्या साह्याने पाडावी. यामुळे पुढे पाऊस पडल्यास जास्तीचे पाणी जमिनीत मुरते. ओलावा जास्त काळ टिकून राहतो. पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी तुषार सिंचनाने द्यावे. मूग पीक सध्या फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत. पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पिकास संरक्षित पाणी द्यावे. मका पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास तुषार सिंचनाने संरक्षित पाणी द्यावे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पिकाची आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे. त्यामुळे ओलावा जास्त दिवस टिकून राहील. आंतरमशागतीची कामे झाल्यानंतर दोन ओळीनंतर एक बळिराम नांगराच्या साह्याने एक जलसंधारण सरी काढावी. बीटी कापूस पीक सध्या फुले, पाते लागण्याच्या अवस्थेत आहे. जमिनीत ओलावा टिकून ठेवण्यासाठी वारंवार कोळपणी, वखरणी करावी. जेणेकरून जमिनीवर पडलेल्या भेगा बुजून खालच्या थरातील ओलावा टिकून राहील. जमिनीत जास्त ओलावा नसल्यामुळे पीक मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण करू शकत नाही. तसेच पिकावरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३ः००ः४५) २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये दोन ओळीनंतर एक जलसंधारण सरी पाडावी. जेणेकरुन पाऊस झाल्यावर सरीमध्ये पाणी जास्त साचून ओलावा जास्त काळ टिकून राहतो. तसेच जास्त पाऊस झाला, तर या सरीवाटे जास्तीचे पाणी शेताबाहेर निघून जाते. पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.

आच्छादन ज्या ठिकाणी खरीप पिकाचे क्षेत्र कमी आहे, अशा ठिकाणी आच्छादनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. वाळलेले गवत, सोयाबीन पिकाचा भुसा, ऊस पाचट, पालापाचोळा, गिरिपुष्प पाला ३ ते ५ टन प्रतिहेक्‍टरी वापरावा. कोळपणी जमिनीच्या पृष्ठभागावरचा पातळ थर हा ८ ते १० दिवसाच्या अंतराने कोळपणीद्वारा भुसभुशीत करून घ्यावा. मातीचे आच्छादन तयार होते. जमिनीमध्ये पडणाऱ्या भेगा बुजतात. बाष्पीभवनास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ओलावा टिकून राहतो. संरक्षित सिंचन सध्याच्या परिस्थितीमुळे पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी होत असून, बरोबरच तापमानवाढीमुळे पिकांची पाण्याची गरज वाढत आहे. जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे बहुतांश भागातील शेततळी पाण्यानी भरलेली आहेत. त्यातील पाण्याचा वापर पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी करावा. संरक्षित सिंचनासाठी शक्‍यतोवर तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. वाऱ्याचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी संरक्षित पाणी द्यावे.

संपर्क : डॉ. भगवान आसेवार, ७५८८०८२१३६ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) ....................................

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT