मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत नऊ गावांची निवड
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत नऊ गावांची निवड 
ग्रामविकास

मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत नऊ गावांची निवड

माणिक रासवे

परभणी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील नऊ गावांची निवड झाली आहे. या गावांच्या शाश्वत विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या गावांचा मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी ग्रामविकास, कृषी विभाग; तसेच अन्य विभागांच्या योजना प्राधान्याने लोकसहभागातून राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तीन गावांमध्ये शेतकरी गटांमार्फत दाल मिल सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी दिली. मानवी विकास निर्देशांक कमी असलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानअंतर्गत पालम तालुक्यातील सिरसम, कापसी, रोकडेवाडी, नाव्हलगाव, गंगाखेड तालुक्यातील आरबुजवाडी, मसनेरवाडी, डोंगरजवळा, बेलवाडी, पूर्णा तालुक्यातील कानडखेडा या नऊ गावांची निवड करण्यात आली आहे. ग्राम प्रशासनाला नियोजन प्रक्रियेत मदत करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपविण्यात आली आहे. ग्राम प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील सुसंवादतून नियोजनातील लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. गावांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचा योग्य वापर होत असल्याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. या अभियानांतर्गतची सर्व गावे शासनाच्या सर्व योजनांसाठी संरक्षित करण्यात आली आहेत. या अभियानामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठीस प्रत्येक गावांमध्ये एका सामाजिक परिवर्तक नेमणूक करण्यात आली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी; तसेच लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या अभियानाची प्रभावीपणे कार्यक्षमरित्या अंमलबजावणी करण्यासाठी सहा सदस्यीय जिल्हा अभियान परिषद अभियान परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या परिषदेचे अध्यक्ष असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), अग्रणी विकास संस्थेचा प्रतिनिधी, ग्रामविकास सहकारी या परिषदेचे सदस्य आहेत. कापसी, नाव्हलगाव (ता. पालम) आणि डोंगरजवळा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभिायानांतर्गत शेतकरी गटांना दाल मिल मंजूर करण्यात आल्या आहेत. कापसी येथील दालमिलचे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे मुख्य कार्यकारी रामनाथ सुब्रमण्यम यांच्या हस्ते रविवारी (ता.२४) झाले असे जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी सांगितले. अभियानांतर्गत ही कामे होणार  शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता अभियान, शैक्षणिक सोयी सुविधा दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, टंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारण कामे, शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसायास चालना दिली जात आहे. येत्या काळात या गावांमध्ये ई -मेडिसीन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

SCROLL FOR NEXT