Indian agriculture Agrowon
ॲग्रो गाईड

Agriculture : शेती शोषणमुक्त कधी होणार ?

शेती हा जगण्याचा मूलाधार आहे, हे तत्त्व कोणीही नाकारत नाही. अगदी शेती, शेतकरी समुदायाचा द्वेष करणारेही नाकारत नाहीत.

टीम ॲग्रोवन

शेती हा जगण्याचा मूलाधार आहे, हे तत्त्व कोणीही नाकारत नाही. अगदी शेती, शेतकरी समुदायाचा द्वेष करणारेही नाकारत नाहीत. तरीही गंमत अशी असते, की काही लोकांच्या घरात मी पाहिले आहे की अन्नधान्य, भाजीपाला हा मातीतून पिकतो याची घरातल्या मुलांना माहिती नसते आणि शेती संस्कृतीबद्दल मुलाबाळांना काही ठाऊक असावे असे घरातल्या तथाकथित ज्येष्ठ लोकांनाही वाटत नाही. शेतीवर पोषण होणारा पण तिच्या शोषणाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असणारा एक मोठा वर्ग भारतासारख्या कृषिप्रधान (Indian Agriculture) देशात अस्तित्वात आहे.

हा जो वर्ग आहे तो प्रामुख्याने शेतीचे शोषण करणारा आहे. यात कारखानदार, व्यापारी, दलाल, शहरी मध्यमवर्गीय लोक, लगतच्या पिढीचे शेतकरी असणारे पण नव्याने मध्यमवर्गीय झालेले नोकरदार, शेती हा जोडधंदा म्हणून तिच्यातलेच अत्याधिक उत्पादन आयटी परताव्यावर दाखवणारे राजकीय नेते अशा अनेकांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे शेती आणि शेतकरी हा शोषण करण्यासाठीच असतो, असा या प्रवृत्तीचा समज एकविसाव्या शतकातही दूर झालेला नाही.

शेती हा भांडवल निर्मितीचा पाया असतो आणि तरीही शेतीप्रधानता म्हणजे मागासलेपणा असं सांगणारेही शेतीचे मूलभूत अस्तित्व नाकारत नाहीत. याचीही काही कारणे आहेत. एक तर शेती-मातीचे मूलभूत अस्तित्व ही ठरवून नाकारण्यासारखी बाब नाही. शेतीसंदर्भात काही बाबी अशा आहेत की भौतिक विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी भूमीतील उत्पादनाला पर्याय देणे कोणालाही शक्य होणार नाही. या अर्थानेही शेती हेच एक मूलभूत विज्ञान आहे, हे मान्य करावे लागते. तरीही शेती आणि तीवर अवलंबून असणारा एक मोठा विश्‍वव्यापी वर्ग इतिहास काळापासून कायम भक्ष्यस्थानी का पडत आला, याचा शोध अनेकांनी आपल्या परीने घेतला असला, तरी या शोधाचे जे अंतिम रूप असावे, म्हणजे शेती शोषणमुक्त होणे किंवा कमीत कमी शोषणावर उभी असणे, साध्य झालेले नाही, होईल असे वाटत नाही.

शेती करणे हा सुखकारक धंदा नाही, असं शेती न करता शेतीबद्दल बोलणारेही शेतीविषयी करुणेने बोलत असतात. अंतिमतः शेती आणि शेतकरी म्हणजे करुणा, दया, क्षमा, शांती असाही क्रम लावता येऊ शकेल एवढी भावनात्मक आर्द्रता शेतीच्या सहानुभूतीदार आणि टीकाकार या दोन्हींमध्ये आहे. तात्पर्य शेती हा शब्द करुणा असाही लिहिता येऊ शकेल एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात.

शेती म्हटले की काही प्रतिमा सरळ समोर येतात, ज्यांना कुठलाही पर्याय मला गवसत नाही. बळीराजा, महानुभाव महात्मा चक्रधर, ज्ञानेश्‍वर आणि समकालीन गोरोबा सावता माळी, नामदेव, तुकोबा, राजा शिवाजी, महात्मा फुले, तंट्या भिल्ल, महात्मा गांधी, गाडगेबाबा, महर्षी शिंदे, पंजाबराव देशमुख, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, शरद जोशी अशी एक शतकानुशतकातील एक यादी आहे. यात अजून काही नक्कीच मागेपुढे मिसळता येईल. यातला एकेक महानुभाव म्हणजे विचारांचे एकेक स्वतंत्र विद्यापीठ आहे....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT