जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म. हे गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे पोषण आणि दीर्घकालीन अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक मोजले जातात. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा. पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता महत्वाची आहे.
महाराष्ट्रातल्या जमिनी दक्खनच्या काळ्या कातळापासून (बेसाल्ट) बनलेल्या आहेत. या खडकावर पाऊस, ऊन, हवा, सूक्ष्मजीव, उतार, वनस्पतींच्या मुळ्या यांच्या परिणामामुळे झीज होऊन माती तयार झाली. हीच माती वनस्पतींसाठी अन्नद्रव्यांचा स्रोत व आधार ठरते. कमी पाऊस आणि उष्ण कोरड्या हवामानामुळे बेसाल्ट खडकापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जमिनी हलक्या ते खोल काळ्या रंगाच्या झाल्या आहेत. या उलट याच खडकावर जास्त पाऊस पडल्यामुळे लॅटरायझेषणची प्रक्रिया सुरू होऊन त्यात आयर्न (लोह) व ॲल्युमिनियम ऑक्साइड शिल्लक राहिले. यामुळे कोकणातील जमिनींचा रंग लाल दिसून येतो.
जमिनींचे खोलीनुसार प्रकार
कोकणातील लाल तांबड्या जमिनीचे प्रमाण ५.६ टक्के आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजलेल्या लाल मातीचे थर (रेड बोल) आढळून येतात, परंतु त्यांचे गुणधर्म कोकणातील लाल मातीसारखे नसतात. ह्या रेड बोल मातीचा लाल रंग फार वर्षांपूर्वी लाव्हा रसामुळे माती विटांप्रमाणे भट्टीत भाजल्यामुळे तयार होतो. ही माती निकस असून, त्यात चुनखडीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. म्हणून ही घाटावरची लाल माती शेडनेटमध्ये वापरण्यापूर्वी चुनखडीचे प्रमाण तपासूनच (मुक्त चुनखडी ५ % पेक्षा कमी असल्यावरच) वापरावी.
जमिनीची सुपीकता जमिनीतील उपलब्ध असलेल्या आवश्यक त्या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकाला पुरवण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता म्हणतात. माती परीक्षणाद्वारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते. एकंदरीतच राज्याचा सुपीकता स्तर नत्राच्या बाबतीत कमी ते मध्यम, स्फुरदाचे प्रमाण कमी ते अत्यंत कमी आणि पालाशचे प्रमाण भरपूर ते अत्यंत भरपूर असे आहे. महाराष्ट्रातील सुपीकता निर्देशांकात १९८० ते २००५ या कालावधीत सातत्याने घट होताना दिसून येते. यामुळेच जमिनीमध्ये १ किलो अन्नद्रव्य (नत्र + स्फुरद + पालाश) टाकले असता फक्त ६ किलो अन्नधान्य उत्पादन प्रति हेक्टरी मिळते. हेच उत्पादन याच जमिनींतून २५ वर्षांपूर्वी १६ किलो प्रती हेक्टरी मिळत होते. म्हणजेच जमिनीची सुपीकता सुमारे ६२ टक्क्याने कमी झाली आहे. जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे पोषण दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक मोजले जातात. जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे ६.५ ते ८.० पर्यंत असावा. क्षारता ०.१० ते ०.५० डेसीसायमन/मीटर असावी. चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असावे. महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त जस्ताची कमतरता ४२.०५ टक्के दिसून येते. त्या खालोखाल लोह (९.०४) या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. तसेच बोरॉनचीसुद्धा कमतरता जास्त विम्लधर्मीय चुनखडीयुक्त व कोकणातील तांबड्या जमिनीत ३२ टक्क्यांपर्यंत आढळून येते.
कृषी हवामान विभाग व जमीन घडण
सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे
जमिनीच्या शाश्वत आरोग्य व्यवस्थापनासाठी
- शुभम दुरगुडे, ९४२०००७७३२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.