ऊस तुटून गेल्यानंतर कोयत्याने बुडखे जमिनीलगत तासून घ्यावेत. त्यानंतर नांगराने सरीच्या बगला फोडून त्यात पाचट गाडावे. त्यानंतर पहिल्या पाण्याच्या पाळीबरोबर हेक्टरी २५ किलो नत्र (५४ किलो युरिया), ६० किलो स्फुरद (३७५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ६० किलो पालाश (१०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. ही सर्व कामे ऊस तोडणीनंतर १५ दिवसांच्या आत पूर्ण करावीत.ऊस तोडणी झाल्यापासून ६ ते ८ आठवड्यांनी फक्त हेक्टरी १०० किलो नत्र (२१७ किलो युरिया), १२ ते १६ आठवड्यांनी २५ किलो नत्र (५४ किलो युरिया) व शेवटी मोठ्या बांधणीच्या वेळी १०० किलो नत्र (२१७ किलो युरिया), ५५ किलो स्फुरद (३४४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५५ किलो पालाश (९२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.खोडवा ऊस पिकास पहारीच्या साह्याने खते देण्यासाठी तोडणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत हेक्टरी १५० किलो नत्र (३२५ किलो युरिया), ७० किलो स्फुरद (४३७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ७० किलो पालाश (११७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) को. ८६०३२ या जातीसाठी द्यावे. इतर जातींसाठी हेक्टरी १२५ किलो नत्र (२७१ किलो युरिया), ५८ किलो स्फुरद (३६३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ५८ किलो पालाश (९७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. त्यानंतर १३५ दिवसांनी हेक्टरी १५० किलो नत्र (३२५ किलो युरिया), ७० किलो स्फुरद (४३७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ७० किलो पालाश (११७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) हे को ८६०३२ या जातीसाठी द्यावे. इतर जातींसाठी हेक्टरी १२५ किलो नत्र (२७१ किलो युरिया), ५७ किलो स्फुरद (३५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ५७ किलो पालाश (९५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पंधरा फेब्रुवारीपूर्वी तोड झालेल्या उसाचा खोडवा ठेवावा. कीड, रोग प्रादुर्भावग्रस्त उसाचा खोडवा ठेऊ नये. भाजीपाला मिरची, वांगी, भेंडी, कारली, दोडका, दुधी, टरबूज, खरबूज, काकडी, गवार, घेवडा लागवडीस सुरवात करावी. संपर्क ः आर. एच. हंकारे ९८५०७१८०४१ ( विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे)