Farmer Loan : राज्यात शेतकरी संपूर्ण कर्जमाफीची प्रतिक्षा करत आहेत. परंतु राज्य सरकार मात्र कर्जमाफीच्या आशेवर शेतकऱ्यांना झुलवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज परतफेड थकली आहेत. या पार्श्वभूमीवर किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी कर्जमाफीसाठी मैदानात उतारण्याचा सोमवारी (ता.२८) इशारा दिला आहे.
राज्यात शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असं म्हणत नवले यांनी सरकारला आश्वासनाची आठवण करून दिली. "सत्तेवर येण्यासाठी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे राज्य सरकारने कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांच्या प्रचंड उद्रेकाला सरकारला समोरे जावं लागेल,"
राज्य सरकारच्या आश्वासनामुळे शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. कर्जाची परतफेड शेतकरी करत नाहीत. त्यामुळे शेतकरी, सहकारी संस्था, सोसायटी आणि सहकारी बँक अडचणीत आल्या आहेत. कर्जमाफीची जबाबदारी सरकारची आहे, असे नवले म्हणाले.
पुढे नवले यांनी मागील दोन कर्जमाफीचा अनुभवावरून भाष्य केलं. ज्याचं (शेतकऱ्यांचं) कर्ज थकीत आहे, त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळतो. जे (शेतकरी) नियमित कर्ज भरतात, त्यांना कोणताही लाभ देण्याची इच्छा राज्य सरकारकडे नसते. त्यामुळे आता कर्ज थकवलं पाहिजे, कारण राज्य सरकार आता कर्जमाफी देणार आहे, या आशेने शेतकऱ्यांनी कर्ज भरली नसल्याचे ते म्हणाले.
राज्यातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाचा आकडा ३१ हजार कोटींवर गेला आहे. याकडे लक्ष वेधत पुढच्या हंगामात सावकारी कर्जाच्या विळाख्यात शेतकरी अडकेल, अशी चिंता व्यक्त केली. थकीत कर्ज असल्याने शेतकरी पुढच्या हंगामात नवीन कर्ज घेण्यासाठी बँक राहणार नाहीत. त्यामुळे स्वस्त व्याज दरातील कर्ज सोडून त्यांना सावकाराच्या दारात उभं राहावं लागेल, हे सगळे गोंधळ निवडणूक केंद्री घोषणा केल्यामुळे झाले आहेत, असा आरोप डॉ. नवले यांनी केला.
दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जाच्या विळाख्यातून बाहेर काढण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने केली आहे. समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता दिसत आहे. परंतु त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असून शेतकरी आत्महत्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.