Grape Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Disease : बुरशी, जीवाणूजन्य करपा रोगाने द्राक्ष बागा उद्‌ध्वस्त

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गेली चार वर्षे नैसर्गिक संकटांमुळे द्राक्ष पीक तोट्यात असतानाच यंदा द्राक्षातून चांगले पैसे हाती मिळतील अशी आशा शेतकऱ्यांनी ठेवली होती. पण यंदा द्राक्षावर जीवाणूजन्य, बुरशीजन्य करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने बागाच्या बागा उद्‌ध्वस्त होऊ लागल्या आहेत.

त्यामुळे हे नव्या संकटामुळे सुमारे ५ हजार एकरांवरील बागांतील घडच काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून सुमारे ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाच्या सांगली विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे द्राक्षासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यातील शेतकरी संकटावर मात करुन द्राक्ष बागा फुलवत आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीचा फटका द्राक्ष उद्योगाला बसला. त्यातून द्राक्ष उत्पादक कसाबसा सावरत असतानाच अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या बागांचे नुकसान झाले.

त्यामुळे चार वर्षांपासून द्राक्ष पीक उत्पादकांवरील संकटाचे शुक्लकाष्ठ संपण्याचे चित्र नाही. यंदाच्या हंगामातही कमी पाऊस आणि पाण्याची टंचाई यावर मात करत शेतकऱ्यांनी बागा साधल्या. यंदा द्राक्षातून चांगले पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली होती.

गेल्या काही दिवसांपासून बदलते वातावरण यामुळे भुरी, डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यावर बुरशीनाशकांची फवारणी करुन रोग नियंत्रणात आणण्यात शेतकऱ्यांना यश आले. मात्र जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर गेला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. हा प्रादुर्भाव फळ छाटणीनंतर २५ ते ६० दिवसांच्या फळ छाटणीवरही वाढला. परंतु या रोगांना शेतकऱ्यांना रोखता आले नाही.

शेतकऱ्यांनी हंगाम धरण्यापासून बागेला खर्च केला. पण दोन्ही रोगांच्या प्रादुर्भावामुळे तयार झालेले आणि विक्रीला आलेले घडच बाधीत होवू लागले आहेत. त्यामुळे बागेतील घड काढल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे चित्र आहे. या साऱ्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार एकर क्षेत्र रोगांना बळी पडले असून अंदाजे ३०० कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

कर्जाची परत फेड कशी होणार?

द्राक्ष पिकासाठी शेतकरी पीककर्ज घेतो. त्यातून हंगामाला लागणारी बुरशीनाशके, खते आणि इतर खर्चाला या कर्जाचा उपयोग करतो. द्राक्ष विक्रीतून मिळालेल्या पैशातून कर्जाची परतफेड केली जाते.

परंतु यंदा द्राक्ष विक्री करण्यापूर्वीच जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांमुळे घड काढून टाकल्याने बागेतील वेली घडाविना तशाच उभ्या आहेत. त्यामुळे पैसे कोठून येणार असा प्रश्न पडल्याने कर्जाची परतफेड कशी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

अगोदर द्राक्ष शेतकरी संकटात आहे. आता जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवरील संकट वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार एकरांवरील या रोगांमुळे द्राक्ष बाधित झाले आहे.
- चंद्रकांत लांडगे, अध्यक्ष, मध्यवर्ती विज्ञान समिती
दोन एकर द्राक्ष बागेवर दोन्ही करपा रोगांचा प्रादुर्भाव असल्याने ६० टक्के द्राक्षे काढून टाकली आहेत. जवळपास पाच ते साडेपाच लाखांचे नुकसान आहे. कर्ज कसे फेडायचं हाच प्रश्न आता समोर आहे.
- संतोष तपकिरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कवलापूर, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT