unseasonal rains  Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Unseasonal Rain : सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा प्रकोप

पावसामुळे शेतकऱ्यांनी वाळवणीस घातलेल्या हळदीचेही नुकसान होत आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत.

Team Agrowon

Nanded Weather Update : नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (ता. २६) दुपारी व रात्री वादळी वाऱ्यांसह गारपीट होऊन उन्हाळ्यात लागवड केलेली ज्वारी, सोयाबीन, टरबूज, आंबा, केळी, पपई यांसारखी पिकांच्या नुकसानीचे प्रमाण वाढले आहे.

शेतकऱ्यांनी वाळवणीस घातलेल्या हळदीचेही नुकसान होत आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. पावसादरम्यान वीज पडून दोन व्यक्तीही दगावल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेडमध्ये सोमवारपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासोबतच गारपीट होऊन जोराचा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातची पिके उद्ध्वस्त होत आहेत.

सोमवारी (ता. २४) नांदेडसह अर्धापूर, मुदखेड, नायगाव, कंधार, लोहा, माहूर, किनवट या तालुक्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकांसह पपई, आंबा, टरबूज, उन्हाळी सोयाबीन, ज्वारी ही पिके आडवी झाली.

यानंतर मंगळवारीही जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस झाला. या वेळी वीज पडून जिल्ह्यातील आठ जनावरांचा मृत्यू झाला. अशातच पुन्हा बुधवारीही (ता. २६) जिल्ह्यात पुन्हा अवकाळीने जोरदार हजेरी लावली. या वेळी गारांचाही मारा झाला आहे.

परिणामी, नायगाव, लोहा, कंधार तालुक्यांतील हळद, उन्हाळी सोयाबीन, उन्हाळी ज्वारी, टरबूज, पपई, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

माहूर तालुक्यातील रुई येथे बुधवारी रात्री दीडच्या सुमारास जोरदार गारपीट, वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. यात उन्हाळी ज्वारीसह घर, गोठ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीज ठप्प झाली आहे.

वीज पडून दोघांचा मृत्यू ...

वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. यात नांदेड तालुक्यातील जवाहरनगर येथील तारासिंग बाबूराम (वय ४०) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तर नांदेड शहराजवळील मालटेकडी भागातील कामठा परिसरात वीज पडून शेख वजीर शेख चांद (वय ४२) यांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले.

नायगाव तालुक्यात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला. यामुळे तालुक्यातील हळद, उन्हाळी सोयाबीन, उन्हाळी ज्वारी, टरबूज, पपई, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उभे पिके आडवी झाली आहेत. तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी.
साई पाटील मोरे देगावकर, छावा तालुका संपर्क प्रमुख, नायगाव तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT