Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation : ‘ताकारी’चे तिसरे आणि रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू

Team Agrowon

Sangli News : ताकारी लाभक्षेत्रातील पाण्याची मागणी विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ताकारी योजनेचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन दोन दिवसांपूर्वी सुरू केले आहे. पाण्याचा लाभ १८ हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे.

मात्र, कृष्णा नदीत पाण्याची पातळी कमी असल्याने आवर्तन पूर्ण होण्यासही उशीर झाला. दुसऱ्या आवर्तनालाही पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु दुसरे आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

ताकारी योजनेचे यंदाचे पहिले आवर्तन खरीप हंगामात दिले. नंतर रब्बीतील पहिले व या वर्षीचे दुसरे आवर्तन ५ नोव्हेंबर रोजी सुरू केले. अनेक वेळा तांत्रिक बिघाड व अवकाळी पावसामुळे योजना बंद ठेवावी लागली.

परिणामी ३५ दिवस चालणारे आवर्तन ५० दिवस चालवावे लागले. आवर्तनासाठी कृष्णा नदीतून १.१ टीएमसी पाणी उचलण्यात आले. ताकारी योजनेच्या सर्व लाभक्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध झाले होते. सोनी (ता. मिरज) पर्यंत (१४४ किलोमीटर) सर्व लाभक्षेत्राला पाणी दिल्यानंतर ते आवर्तन बंद केले.

ताकारीच्या वाट्याचे या वर्षीचे ३.६ टीएमसी पाणी उचलणे बाकी आहे. चालू आवर्तन ३० ते ३५ दिवस देण्याचे नियोजन आहे. ताकारी योजना सक्षमपणे कार्यरत असून लाभक्षेत्रातील शेती समृद्ध झाली आहे.

सोडलेले पाणी मुख्य कालव्यातून १४४ किलोमीटरवर (सोनी, ता. मिरज) पोहोचणार आहे. यावरील सर्व पोटकालव्यांना पुरेसे पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी गडबड करू नये. तसेच पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.
राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT