Indian Society of Agricultural Engineers Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Society of Agricultural Engineers : संवर्धित शेतीसाठी कृषी अभियंत्याची भूमिका महत्त्वाची ; डॉ. आर. एस. परोडा

Agricultural Engineers : युवकांचा शेतीमधील सहभाग वाढविण्यासाठी कौशल्य वृद्धिंगत करावी लागतील. याकामी कृषी अभियंत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा यांनी केले.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : परभणी ः माती व पाणी या नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संवर्धित आणि संरक्षित शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागेल. युवकांचा शेतीमधील सहभाग वाढविण्यासाठी कौशल्य वृद्धिंगत करावी लागतील.

याकामी कृषी अभियंत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मंगळवार (ता. १२) ते गुरुवार (ता. १४) या कालावधीत भारतीय कृषी अभियंता सोसायटी (इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी मंगळवारी (ता. १२) डॉ. परोडा बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. डॉ. इंद्र मणी मिश्रा होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महिंद्रा कृषी अवजारे आणि टॅक्टर्सचे अध्यक्ष हेमंत सिक्का, टाफे ग्रुपचे अध्यक्ष डॉ. टी. आर. केशवन, ‘महिको’चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, कुमार बिमल, प्रो. गजेंद्र सिंह, डॉ. नवाब अली, माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, डॉ. के. पी. गोरे, डॉ. एन. एस. राठोड, डॉ. ए. एस. धवन, भारतीय कृषी अभियंता सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा, डॉ. पी. के. साहू, डॉ. हरिहर कौसडीकर, निमंत्रक तथा शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग, डॉ. भगवान आसेवार, डॉ. हरिश आवारी, प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत देशमुख वरपुडकर उपस्थित होते.

डॉ. परोडा म्हणाले, की देशातील अन्नधान्याची उत्पादन वाढले, परंतु नासाडीदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. हरितक्रांती झाली असली तरी सदोदित हरितक्रांतीची गरज आहे. शेती प्रधान देश शेतकरी प्रधान झाला पाहिजे. नोकरी करणारे नव्हे तर कृषी उद्योजक युवक घडले पाहिजेत. खुरपी, विळ्यापासून ते शेतीपिकांची काढणी करणारी यंत्र तसेच सोयाबीन, फळपिकांवर प्रक्रिया करणारी सहज हाताळण्याजोगी यंत्रसामग्री शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना पुढाकार घ्यावा लागेल.

गावोगावी भाडेतत्त्वावर अवजारे पुरवठा करणारी केंद्रे सुरू करावी लागतील. त्यासाठी कृषी अभियंते, कृषी शास्त्रज्ञांना हातात हात घालून काम करावे लागेल. हरितगृहातील संरक्षित शेती, मातीची धूप थांबविण्यासह सुपीकता टिकविण्यासाठी सूक्ष्म सिंचनाच्या वापरावरासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागले.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की आगामी काळातील शेती ही अभियांत्रिकी शेती असेल. त्यादृष्टीने कृषी यांत्रिकीकरण, ड्रोन तंत्रज्ञान यातील संशोधनावर विद्यापीठ भर देत आहे.

सिक्का म्हणाले,की मृदा, जलसंधारणासह कृषी यांत्रिकीकरणात भारतीय कृषी अभियंता सोसायटीचे योगदान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली.

केशवन म्हणाले, की सीमांत व लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अवजारे विकसित झाली पाहिजेत. या वेळी भारतीय कृषी अभियंता सोसायटीतर्फे पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा यांना मानद फेलोशिपने गौरविण्यात आले. विविध राज्यातील कृषी अभियंत्यांना पुरस्कार, पदके देऊन सन्मानित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune MTI Journey: ‘एमटीआय’ची आठ दशकी दमदार वाटचाल

Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

SCROLL FOR NEXT