Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : उन्हाच्या तीव्रतेने प्राण्यांच्या जिवाचीही‌ काहिली

Water Crisis : उष्णतावाढीचा परिणाम जनजीवनावर झाला असून, म्हसदीसह परिसरातील वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणीही सैरभैर झाल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Dhule News : उष्णतावाढीचा परिणाम जनजीवनावर झाला असून, म्हसदीसह परिसरातील वनक्षेत्रात पाण्याचा टिपूस नसल्याने वन्यप्राणीही सैरभैर झाल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. २७) दुपारी रणरणत्या उन्हात काळगाव रस्त्यावर दुचाकीस्वारांना वानरांचा कळप सैरभैर होताना दिसला.

भर उन्हात मुक्या प्राण्यांची झालेली काहिली... दुचाकीस्वारांना खूप काही सांगून गेली. वाढत्या उन्हामुळे वन्यप्राण्यांनादेखील उष्माघाताचा त्रास होऊ शकतो हे नाकारता येणार नाही. वन विभागाने वनक्षेत्रात पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यंदा सर्वाधिक तापमान असल्याचे मत ज्येष्ठ व्यक्त करत आहेत.

अत्यल्प पावसामुळे यंदा म्हसदी भागातील वन‌क्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक आहेत. एरवी भक्ष्यासाठी भटकंती करणारे वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत. भक्ष्य आणि पाण्यासाठी बिबटे गावकुशीकडे धाव घेत असल्याचे वन विभागाने मान्य केले आहे. ऐन पावसाळ्यातही वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक होते. एरवी शिकारी (सावज)च्या शोधार्थ फिरणारे बिबटे, तडस यांसारखे वन्यपशू पाण्यासाठी सैरभैर झाले आहेत.

शिवाय वानरे, कोल्हे, ससे यांसारखे प्राणीही आपली तृष्णा कशी भागवत असतील, असा प्रश्न प्राणीप्रेमींनी उपस्थित केला आहे. वनक्षेत्रातील पाणवठ्यात पाणीच नसल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवारच काय गावकुशीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. काळगाव (ता. साक्री) येथे ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वनक्षेत्रालगतच्या हिराळा डोंगरालगत हौद, तर राहूड रस्त्यावर जुन्या हौदात पाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती सरपंच संजय भामरे यांनी दिली.

प्राणी, पक्ष्यांचे स्थलांतर

साक्री तालुक्यात हजारो हेक्टर सुरक्षित वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात ससा, हरणे, कोल्हे, लांडगे, तडस, वानरे, बिबटे यांसारखे वन्यपशू, तर मोर, तितर, कबुतरे यांसारखे पक्षी आहेत. यंदा ऐन पावसाळ्यातही पाणवठ्यात पाणीसाठा नव्हता.

आज तर कुठेच पाण्याचा टिपूस नाही. पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू महसूल क्षेत्रात येतात किंवा स्थलांतर करतात. स्थलांतर करून ते पशु-पक्षी जातील तर कुठे, हाही प्रश्न आहेच. दर वर्षी वन्यपशूंची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. जंगल संपत्तीच्या संवर्धनाबरोबरच पशु-पक्ष्यांचेही संवर्धन होणे आवश्यक असल्याचे निसर्ग, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सिताफळाची आवक वाढली; आवळ्याला कमी उठाव, हिरवी मिरची नरमली, लिंबुचे दर टिकून, लसणाचे दर स्थिर

Leopard Attack : निमगावात बिबट्याचा घोड्याच्या शिंगरूवर हल्ला

Dam Water Discharge : वाघूर, गिरणातून विसर्ग

Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात १.३३ लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा

Rain Damage Jalgaon : पावसाने जळगाव जिल्ह्यात हानी

SCROLL FOR NEXT