Raju Shetti On Kalammawadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : काळम्मावाडी धरणाची गळती दुप्पट; शासन काय लपवतयं? शेट्टींचा गळतीबाबत धक्कादायक दावा

Raju Shetti On Kalammawadi Dam : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी काळम्मावाडी धरणाच्या गळतीबाबत धक्कादायक दावा केला आहे. तसेच कामावरून सरकारला धारेवर धरले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यासाठी राधानगर आणि काळम्मावाडी धरण महत्वाचे आहे. पण गेल्या काही वर्षांपासून राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरण म्हणजेच दूधगंगा धरणाला गळती लागली आहे. याबाबत धरण प्रशासन गळतीची चुकीची माहिती देत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.२०) केला आहे. तसेच त्यांनी काळम्मावाडी धरणातून प्रतीसेकंद ३५० नाही तर ७०० लिटर पाण्याची गळती होत असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न अनेकदा उपस्थित केला गेला आहे. याबाबत दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी देखील विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. ज्यानंतर सरकारने गळती काढण्यासाठी ८० कोटींच्या निधीची तरतुद केली होती. निधी देखील मिळाला असून कामाला मात्र मुहुर्त मिळालेला नाही. यामुळे आता धरणाच्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गळतीच्या माहितीत तथावत ?

सध्या राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सूरू असून काँग्रेसने नेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी त्यांच्याकडील माहिती पटलावर ठेवताना गळती २७० लिटर प्रतिसेकंद होत असल्याची माहिती दिली. पण प्रत्यक्षात शासनाच्या म्हणण्यानुसार गळती ३५० लिटर प्रतिसेकंद आहे. तर राजू शेट्टी यांनी प्रत्यक्ष गळती ७०० लिटर प्रतिसेकंद असल्याचा दावा केला आहे. याचा अर्थ गळतीच्या माहितीत तथावत असल्याचे सोर येत आहे. यामुळे धरणातून नक्की किती गळती होतेय? असा सवाल आता जिल्ह्यातील जनता करत आहे.

दरम्यान शेट्टी यांनी धरणावर जाऊन धरणाची पाहणी केली. ज्यानंतर गळतीची सत्य स्थिती आता समोर आली आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार धरणाची गळती प्रति सेकंद ३५० लिटर आहे. मात्र प्रत्यक्षात धरणातून गळती प्रति सेकंद ६५० ते ७५० लिटर असल्याचा दावा केला शेट्टी केला आहे.

तसेच काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे प्रमाण वाढत असून संपूर्ण धरणाच्या भिंतीमधून पाझर फुटत आहे. तर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच धरणाच्या गळतीचे प्रमाण वाढत आहे. तसेच पाणी कमी होत असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. यामुळे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी जनतेच्या हिताचा विचार करून गळती थांबवण्यासाठी तातडीने काम पूर्ण करावे.
- राजू शेट्टी, माजी खासदार

तसेच शेट्टी यांनी गळतीबाबत शासनाने येत्या १५ दिवसात कार्यवाही करावी, अन्यथा शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तर गळती थांबवण्यासाठी कापडी बोळे भरून शासनाच्या निषेध केला जाईल, असेही म्हटले आहे. तर या आंदोलनात राधानगरी तालुक्यातील जनतेला सोबत घेऊ असाही इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

काळम्मावाडी धरणाच्या गळतीबाबत संघटनेच्यावतीने सातत्याने २०२२ पासून आवाज उठविण्यात येत आहे. मात्र, शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून याकडे पूर्ण कानाडोळा केला जात असून मागणी बेदखल करण्यात येत असल्याचा आरोप देखील शेट्टी यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT