Sugarcane Protest agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Protest : उसदराची कोंडी फुटली पण शेतकऱ्यांना पैसे मिळणार का? अद्याप एकाच कारखान्याचे हमीपत्र सादर

sandeep Shirguppe

Sugarcane Owners News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल ८ आडवून धरला. यानंतर प्रशासन कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये सकारात्मक चर्चेअंती ऊसदराची कोंडी फुटली. यामुळे जिल्ह्यात बंद असलेल्या कारखान्यांचे धुराडे पेटणार आहे.

परंतु दुसऱ्या हफ्त्याचे मिळणारे पैसे आहेत त्यासाठी कारखानदारांकडून सहमतीपत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यायचे आहे. अद्याप जिल्ह्यातील दत्त सहकारी साखर कारखाना सोडल्यास कोणत्याही कारखान्याने सहमतीपत्र न दिल्याने संभ्रमाची अवस्था आहे.

गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये प्रतिटन ३००० रुपये पेक्षा जास्त दर दिलेल्या साखर कारखान्यांकडून प्रतिटन ५० रुपये, तर त्यापेक्षा कमी दर देणाऱ्यांकडून १०० रुपये दुसरा हप्ता दोन महिन्यांनंतर दिला जाणार आहे. तसेच, यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिटन ३१०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगून चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

दरम्यान, गेल्यावर्षीच्या उसासाठी प्रतिटन शंभर व पन्नास रुपये देण्यासाठी सर्व कारखान्यांकडून सहमती पत्र घेतले जाणार आहे. जोपर्यंत हे सहमतीचे पत्र देत नाहीत, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा शेट्टी यांनी इशारा दिला आहे.

मागच्या दोन महिन्यात हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील ५ कारखान्यांमध्ये शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात जोरदार संघर्ष पहायला मिळाला. दरम्यान शरद सहकारी साखर कारखाना, गुरूदत्त साखर कारखाना आणि जवाहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादाच्या घटना घडल्या होत्या.

तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी मागच्या वर्षीचा एक रुपयाही देता येणार असा सूर ओढला होता. यावरून हे कारखानदार हमीपत्र सादर करणार का हा मुद्दा उपस्थित होत आहे. जर सादर केले नाहीतर पुन्हा शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजू शेट्टींची घोषणा

गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या ऊस आंदोलनास काल यश मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे , कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावर व जिल्हापोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी केलेल्या शिष्टाईमुळे आंदोलनात तोडगा निघाला.

यामध्ये ठरल्याप्रमाणे गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ३ हजारच्या आतील दर देणारे साखर कारखाने १०० रूपये व ३००० च्या पुढील दर देणारे कारखाने ५० रूपये प्रतिटन व चालू गळीत हंगामामध्ये एफ.आर. पी. अधिक १०० रूपये दर देण्याचा झाला आहे.

सदर निर्णयाप्रमाणे जे कारखाने दर जाहीर केल्यानंतरच ऊसतोडी घेण्याचे असून जे कारखाने याप्रमाणे निर्णय घेणार नाहीत त्यांच्या ऊसतोडी बंद कराव्यात. सदरचा निर्णय मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस प्रमुख यांच्या आदेशाने झाला असून जबरदस्तीने कारखाने चालू करण्याचा प्रयत्न केल्यास त्या कारखान्यांना आता पोलीस सरंक्षण मिळणार नाही. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्या कारखान्यांची ऊस वाहतूक बंद करावी असे शेट्टी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT