Crop Damage
Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : वादळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट

Team Agrowon

Palghar Weather News : पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रब्बीची पिके, फुलशेती, फळबागा आणि वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत.

मार्च महिन्यात खरिपाच्या मशागतीला सुरुवात झाली होती. मात्र राब भाजणीच्या हंगामात पाऊस कोसळ्याने गवत, कवळ्या आणि पालापाचोळा हे राब भाजणीचे साहित्य भिजले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात १५ मार्चपासून सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात रोजच पाऊस कोसळत आहे. काही भागात मेघगर्जना, वादळ तसेच गारपीट होऊन मुसळधार पाऊस कोसळला आहे.

त्याचा मोठा परिणाम फुलशेती, फळबाग आणि रब्बी पिकांवर झाला आहे. फुलशेती, फळबागा आणि रब्बीची पिके अनेक भागांत जमीनदोस्त झाली आहेत.

तसेच जिल्ह्यातील वीटभट्ट्यांमध्ये अवकाळीने अक्षरशः चिखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह वीटभट्टी व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

सरकारने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कर्मचारी संपाने ते सात दिवस रखडले होते. आता कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाल्याने, पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहेत.

‘आम्हालाही भरपाई द्या’

अवकाळी पावसाने रचून ठेवून पेटवलेल्या वीटभट्ट्या अर्धवटच भाजल्या गेल्या आहेत. तसेच तयार केलेला कच्चा माल भिजला असून सर्वत्र चिखलच झाला आहे.

त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कच्चा माल वाचवण्यासाठी त्यावर प्लास्टिक टाकून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

खरीप हंगामासाठी राब भाजणीचे काम सुरू केले होते. भाजणीची संपूर्ण तयारी झाली होती; मात्र आठवड्यापासून रोजच पाऊस येत असल्याने, हे सर्व साहित्य भिजले आहे. त्यामुळे मेहनत आणि खर्च वाया गेला आहे. तसेच आंबा आणि काजूचे मोठे नुकसान झाले आहे. - उमाकांत हमरे, शेतकरी, खोडाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT