Electricity Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Electricity : शेती वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवा

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. तारेच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड होत असल्याने शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही.

Team Agrowon

Nashik News : वाढत्या तापमानात द्राक्ष व रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांना नियमित पाणी द्यावे लागत आहे; मात्र सातत्याने वीजपुरवठा (Electricity Supply) खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे, देखभालीअभावी ट्रान्सफॉर्मर (Transformer) जळण्यामुळे शेतकऱ्यांना पिकाना पाणी देता येत नाही.

विजेअभावी शेतीमालाची होरपळ होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त असताना ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळत आहेत.

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्यांना शेतीपंपासाठी किमान आठ तास सुरळीत वीजपुरवठा करा; अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार दिलीप बनकर यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिला.

निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विजेच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन नाशिक येथे ‘महावितरण’चे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होण्यासाठी बनकर यांनी सूचना केल्या.

निफाड तालुक्यातील विजेच्या समस्या दूर करण्यासाठी कृषी आकस्मिक निधी, सुधारित वितरण क्षेत्र, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम व सामान्य सुधारणा विकास प्रणाली अशा विविध योजनांतर्गत फीडर विलगीकरण, नवीन उपकेंद्र प्रस्तावित करणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविणे, दुरुस्ती करणे, विविध उपकेंद्रांची दुरुस्ती करणे व जोडवाहिनी टाकणे, सिंगल फेज अशी कामे प्रस्तावित असून काही कामे मंजूर आहेत.

मंजूर कामे तत्काळ सुरू करावीत. अनेक कामे अद्याप पूर्ण न झाल्याने तालुक्यातील ग्राहकांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, तसेच गोदाकाठ परिसरात विजेचा प्रश्न गंभीर असून येथील प्रश्न कायमचा निकाली काढण्यात यावा, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. तारेच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड होत असल्याने शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. तालुक्यात मंजूर अतिरिक्त रोहित्रांचे कामदेखील मार्गी लावण्यात यावे.

दोन खांबांमधील जास्त अंतर असल्याने शॉर्टसर्किट होऊन पिके जळण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन खांबांमधील अंतर कमी करण्यासाठी अतिरिक्त पोल टाकणे, दिक्षी फीडर लोड जास्त असल्याने दिक्षी गाव व दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे हे गावे स्वतंत्र करणे.

रोहित्र व वीज उपकेंद्र कार्यान्वित करावे. तसेच नैताळे येथे १३२ केव्हीचे उपकेंद्र प्रस्तावित करण्यात यावे, अशी मागणीदेखील आमदार बनकर यांनी केली.

कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड, उपकार्यकारी एकनाथ कापसे, नीलेश नागरे, ओझरचे उपकार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, सुरेश खोडे आदी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT