Girna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Girna Dam : गिरणा धरणात पाण्याच्या आवकेमुळे साठ्यात किंचित वाढ

Girna Dam Water Storage : जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठा जूनमध्ये घटत होता. परंतु या महिन्यात त्यातील जलसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठा जूनमध्ये घटत होता. परंतु या महिन्यात त्यातील जलसाठा दोन टक्क्यांनी वाढला आहे.

गिरणा धरण नाशिकमधील नांदगाव तालुक्यात आहे. जळगावातील चाळीसगाव व नांदगाव या तालुक्यांच्या सीमांनजीक हे धरण आहे. खानदेशातील सर्वांत मोठे धरण म्हणून गिरणाची ओळख आहे. त्याची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमध्ये आहे. पण त्याचा सर्वाधिक लाभ जळगाव जिल्ह्यास आहे.

जळगावातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल आदी भागांतील २१ हजार हेक्टरवरील रब्बीस त्याचा लाभ होतो. तसेच १०० गावांसह चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहराच्या पाणी योजनाही गिरणा धरणावर अवलंबून आहेत. या धरणातून दरवर्षी टंचाई निवारणार्थ जूनपर्यंत पाच वेळेस नदीत पाणीही सोडले जाते. तसेच मालेगाव औद्योगिक वसाहतीसही पाणी दिले जाते.

या धरणात मागील वर्षी एकूण ५६ टक्के जलसाठा होता. ते जूनअखेरपर्यंत किंवा जुलैच्या मध्यापर्यंत ११ टक्केच होता. त्यात कुठलीही वाढ दिसत नव्हती. परंतु मागील १५ दिवसांतील संततधार पावसाने नाशिकमधील पुनद प्रकल्प भरला आहे. या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, हा प्रवाह गिरणा धरणात येत आहे. धरणात रविवारी (ता. २८) १२ टक्के जलसाठा झाला. तर सोमवारी (ता. २९) १३ टक्के जलसाठा झाला.

मंगळवारी (ता. ३०) सकाळी त्यात १४ टक्के एवढा जलसाठा असल्याची नोंद झाली. धरणात मागील वर्षी २९ जुलैअखेर ३० टक्के जलसाठा होता. परंतु यंदा जलसाठा कमी आहे. कारण धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊसमान जूनमध्ये अल्प होते. तर या महिन्यातही कमी पाऊस झाला. यामुळे गिरणातील जलसाठा झपाट्याने वाढलेला नसल्याची माहिती मिळाली.

...या प्रकल्पांतून विसर्ग

खानदेशात धुळ्यात अनेर नदीवरील अनेर, साक्रीमधील मालनगाव, जामखेली, नंदुरबारातील दरा, सुसरी, देहली, चिरडे, तळोद्यातील धनपूर, जळगावातील यावलमधील मोर, हरिपुरा, वड्री, निंबादेवी, रावेरातील सुकी हे प्रकल्प भरले आहेत. तापी नदीवरील हतनूर धरणातही पाण्याची मोठी आवक आहे.

यामुळे या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खानदेशात सुसरी, कांग, तापी, अनेर, सुकी आदी नद्यांमध्ये चांगले प्रवाही पाणी आहे. हतनूर धरणाचे १८ दरवाजे सोमवारी (ता. २९) पूर्ण उघडण्यात आले होते. मंगळवारी (ता. ३०) मात्र धरणाचे १६ दरवाजे उघडे होते. धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस ओसरल्याने त्यातील विसर्ग कमी करण्यात आल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT