Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : शुकनदीचे पात्र कोरडे

Water Shortage : काही किरकोळ डोहांमध्ये असलेले पाणी एक-दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजेश कळंबटे

Sindhudurg News : जिल्ह्यातील शुकनदीचे (ता. वैभववाडी) पात्र कोरडे पडले आहे. या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेकडो एकर शेती संकटात येण्याची भीती निर्माण झाली आहे. काही किरकोळ डोहांमध्ये असलेले पाणी एक-दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात तापमान ३८ अंश सेल्शियसवर पोहोचले आहे. गेला महिनाभर तर जिल्ह्यात प्रचंड उष्णता जाणवत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणीपातळी चिंताजनक आहे. लघु प्रकल्पांतील पाणीसाठा देखील कमी होत आहे.

दरम्यान, वैभववाडी तालुक्यातील शुकनदीचे पात्र कोरडे पडले आहे. या नदीवर वैभववाडी, सोनाळी, नापणे, उंबर्डे या गावांसह शेकडो गावांतील ऊसशेती आणि फळबागा अवलंबून आहेत. सध्या या नदीतील काही डोहांमध्ये किरकोळ स्वरूपात पाणी आहे.

हे पाणी देखील येत्या एक दोन दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांमधून खांबलवाडी लघू प्रकल्पाचे पाणी शुकनदीत सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

शुक नदीतील पाणी पूर्णतः आटले आहे. पुढील दोन दिवसांत पाण्याची स्थिती बिकट असणार आहे. त्यामुळे आम्ही खांबलवाडी लघू प्रकल्पाचे पाणी शुकनदी पात्रात सोडावे, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. हा निर्णय तातडीने घेतल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
- प्रदीप जैतापकर, सरपंच, नापणे, जि. सिंधुदुर्ग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme Reforms : जुन्या पीकविमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम

Agriculture Research : कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे देशातील १४२ कोटी लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य

Agriculture Scheme: शेततळ्यासाठी २ लाखांपर्यंत मिळणार अनुदान; शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना

Crop Insurance: कृषिमंत्री चौहानांनी केली ३ हजार ९०० कोटी रूपयांची विमा भरपाई वितरीत

Illegal Sand Mining : अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीवर ‘एमपीडीए’अंतर्गत गुन्हे नोंदवा

SCROLL FOR NEXT