Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : शेतकरी आत्महत्यांचे आकडे चिंताजनक

Farmer Death In Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे आकडे चिंताजनक आहेत. केंद्र सरकारने या संदर्भात तातडीने धोरण आखावे,’’ अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे आकडे चिंताजनक आहेत. केंद्र सरकारने या संदर्भात तातडीने धोरण आखावे,’’ अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये विदर्भ, मराठवाड्यामध्ये २६३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत श्री. पवार यांनी केंद्र सरकारकडेही मागणी केली आहे.

श्री. पवार म्हणाले, ‘‘मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांची माहिती चिंताजनक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यासंदर्भात विविध ठिकाणची माहिती एकत्रित करणार आहोत. आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, यात मदतीसाठीची काही नीती ठरवावी. सोमवारचे (ता.१७) संसदीय कामकाज संपल्यानंतर यामध्ये लक्ष घातले जाईल.’’\

कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराबाबत बोलताना श्री. पवार म्हणाले, की ‘एआय’मुळे कृषी क्षेत्राला मोठी मदत होत आहे. उसाला खत आणि पाणी कमी लागत आहे. यातून उसाचा दर्जा सुधारत आहे. यामुळे अनेक साखर कारखान्यांनी त्यांच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना ‘एआय’ तंत्रज्ञानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मी विविध साखर कारखान्यांच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, क्रांतिकारी निर्णय घेणार आहे.

जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चेवर बोलताना पवार म्हणाले, ‘‘जयंत पाटलांनी मला भेटून या होणाऱ्या चर्चांबाबत त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुका होतच असतात. मी व्यक्तिशः काय करायचे ते ठरवलेले नाही. माझे लक्ष कारखान्याच्या इतर प्रश्‍नांवर आहे,’’ असेही श्री. पवार म्हणाले.

‘बीडसाठी कडक धोरण हवे’

‘‘बीड सर्वांना शांत रस्त्याने घेऊन जाणारा जिल्हा होता. मी स्वतः त्या भागावर लक्ष देत होतो. मी सहा-सहा सदस्य त्या ठिकाणी निवडून आणले. एक प्रकारे सामंजस्याचे वातावरण होते. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आहे.

त्याचे दुष्परिणाम गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत. माझे स्वच्छ मत आहे, की राज्य सरकारने कोण आहे, यापेक्षा जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करेल, त्याच्यासंदर्भात अत्यंत कडक धोरण आखण्याची गरज आहे,’’ असे श्री. पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT