Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यात टंचाई वाढू लागली

Water Shortage : जालना जिल्ह्यात टंचाई वाढत आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चाळीसगाव, अमळनेर, पारोळा भागात समस्या बिकट बनू लागली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जालना जिल्ह्यात टंचाई वाढत आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चाळीसगाव, अमळनेर, पारोळा भागात समस्या बिकट बनू लागली आहे. तसेच धरणांतील जलसाठाही घटत आहे. गिरणा पट्ट्यातील समस्या अधिकची बिकट बनत आहे. चाळीसगाव, भडगाव भागातील अनेक मंडले, गावे दुष्काळी स्थितीत आहेत.

प्रशासनाने दुष्काळास तोंड देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. परंतु त्या अपुऱ्या पडतील, असे दिसत आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यःस्थितीत केवळ ५७ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. १६ टँकरद्वारे १५ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी याच काळात जिल्ह्यातील उपयुक्त जलसाठा ७१.०७ टक्के एवढा होता.

जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यःस्थितीत केवळ ५७ टक्के उपयुक्त जलसाठा असून, पुढे टंचाई वाढेल, असे संकेत आहेत. यामुळे टंचाईची तीव्रता वाढेल, असे सांगितले जात आहे. कारण पाऊसमान कमी होते. पावसाची मोठी ओढ होती. काही भागांत पावसाअभावी पिकेही वाया गेली. पावसाने ताण दिल्याने अडचणी तयार झाल्या, परंतु सप्टेंबरमध्ये पाऊस आल्याने काही भागात स्थिती सुधारली.

परंतु अनेक तालुक्यांत जलसाठा वाढलाच नाही. कारण जोरदार पाऊस नव्हा. कमी पावसाचा पिकांच्या वाढीसह उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे. रब्बी हंगामही जेमतेम आहे. जिल्ह्यात रावेर व अन्य तीन तालुक्यांत पाऊसमान बरे होते. अन्य भागात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. सध्या जिल्ह्यात १४ तालुक्यांतील काही मंडळांत दुष्काळी स्थिती तयार झाली आहे. तसेच पुढे टंचाई व दुष्काळी समस्या आणखी तीव्र होईल, असेही दिसत आहे.

गिरणातील जलसाठा घटला

जिल्ह्यात उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. कमाल तापमान ३३ अंश सेल्सीअसपुढे पोचले आहे. सध्या चाळीसगाव तालुक्यात हिवाळ्यातही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. चाळीसगावातील मन्याड मध्यम प्रकल्प कोरडा आहे. तसेच एरंडोलातील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती या प्रकल्पांतही जलसाठा जेमतेम आहे.

सर्वात मोठ्या गिरणा धरणातील जलसाठाही 40 ट्क्क्यांवर आला आहे. यामुळेगिरणा पट्टा दुष्काळाच्या छायेत आहे. मध्यम व लघु प्रकल्पांतील जलसाठा १३.३६ टक्क्यांनी कमी आहे. जलसाठा घटत आहे. याचाही फटका रब्बीसा जसा बसला, तसाच फटका पाणीपुरवठा योजनांनाही बसत आहे. रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर, चोपड्यातील गूळ, जामनेरातील तोंडापूर हे प्रकल्प 100 टक्के भरले होते. यामुळे या भागात जलसंकट कमी आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT