Rajgar Hami Yojna  Agrowon
ॲग्रो विशेष

Rojgar Hami Yojana : मुदत संपूनही ‘रोहयो’चे आराखडे अपूर्ण

Team Agrowon

Solapur News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या सर्वसामान्यांना स्थलांतराची वेळ येऊ नये, त्यांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २० डिसेंबरपर्यंत रोजगार हमी योजनेचे आराखडे जिल्हा कार्यक्रम समन्वयकांकडे सादर करण्याचे आदेश सरकारने दिले. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी सहा तालुक्यांनी अद्याप आराखडे सादर केले नसून १६ हजार विहिरींचे प्रस्ताव अपेक्षित असतानाही केवळ दोन हजार ७२८ लाभार्थींचीच नोंदणी झाली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार तालुकास्तरावरून रोजगार हमी योजनेचे अहवाल २० डिसेंबरपर्यंत जिल्हा कार्यक्रम समन्वयकांकडे आणि २० जानेवारीपर्यंत ते सर्व आराखडे जिल्हा परिषदेला सादर करणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी बैठका घेऊन संबंधितांना सूचना केल्या.

मात्र, २० डिसेंबरपर्यंत माढा, सांगोला, करमाळा, मंगळवेढा व बार्शी या पाच तालुक्यांचेच अहवाल प्राप्त झाले आहेत. मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्यांचे ‘रोहयो’चे आराखडे प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावागावातील सर्वसामान्यांना रोजगार मिळावा,

या हेतूने ‘रोहयो’चे आराखडे ३१ जानेवारीपर्यंत अंतिम होणार आहेत. राज्य सरकारने त्यासंबंधीचा आदेश काढून वेळापत्रक देखील दिले आहे. तरीपण, वेळापत्रकानुसार मुदत संपलेली असतानाही काही तालुक्यांचे अहवाल जिल्हा कार्यक्रम समन्वयकांकडे आलेले नाहीत, हे विशेष.

दोन हजार ७२८ विहिरींची नोंदणी

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. ‘रोहयो’तून सहा महिन्यात विहिरीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. जॉबकार्ड असलेले मजूर त्या कामावर असणे बंधनकारक आहे. दरम्यान, लाभार्थी शेतकऱ्याने विहिरीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे नावनोंदणी करायची आहे.

त्यानंतर ग्रामसेवकाकडून तो प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविला जातो. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांकडून त्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते. पंचायत समिती स्तरावरून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता जास्तीत जास्त ३० दिवसांत देणे बंधनकारक आहे.

‘रोहयो’चे आराखडे प्राप्त झाल्यानंतर ते एकत्रित करून ३१ जानेवारीपर्यंतआयुक्तालयास पाठविले जाणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून दोन हजार ७२८ विहिरींची नोंदणी झाली असून त्यात आणखी वाढ होईल.
इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT