Raigad Flood Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Raigad Flood Alert: नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

Monsoon 2025: दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत.

Team Agrowon

Alibag News: दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढत गेला.

यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सोमवारी रायगड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सकाळी ८.०० वाजेपर्यंत सरासरी ८४ मिलिमीटर पाऊस पडल्‍याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात प्रमुख रस्‍ते, सखल भागांत पाणी साचल्‍याने नागरिकांसह वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसाचा अलर्ट असल्याने अनेकांनी घराबाहेर पडण्याचेच टाळले. अलिबाग तालुक्यातील किनारपट्टीवरील धेरंड, माणकुळे, बहिरीचा पाडा येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पेरणी केलेली भाताची रोपे पाण्याखाली गेल्‍याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

अचानक पावसाचा जोर वाढल्‍याने पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतीच्या कामावर परिणाम झाला. रोहा तालुक्यात अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. महाड तालुक्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. सध्यातरी कोणत्याही भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेले नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली.

२८ लघू पाटबंधाऱ्यांतील पाणीसाठा वाढला

रविवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने कुंडलिका नदीचे पात्र ओसंडून वाहत होते. डोलवहाळ बंधारा येथे कुंडलिका नदीने २३.३० मीटर इतकी उंची गाठली. ही उंची इशारा पातळीपेक्षा ०.३० मीटर जास्त आहे. सोमवारी सकाळी ताम्हिणी घाट, पाटणूस परिसरात जोरदार पाऊस पडल्‍याने अंबा, कुंडलिका नद्यांच्या पातळीत वाढ झाली.

रायगड जिल्ह्यातील २८ लघू पाटबंधाऱ्यांमधील पाणीसाठा वाढला आहे. देवकुंड, झेनिथ, सागरगड धबधबे ओसंडून वाहत आहेत. ताम्हिणी घाटातील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत. पावसाचा आनंद लुटण्यासाठी ताम्हिणी घाटात पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढत आहे.

पर्यटनस्थळांवर बंदीची मागणी

काशीद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर या प्रमुख किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या पावसाळ्यात वाढते. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या लाटांमुळे बुडण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. अशाच प्रकारे तलाव, धबधबे, धरणांमध्ये बुडण्याच्या दुर्घटना घडत असतात. माथेरान येथे तीन तरुण बुडून मृत्युमुखी पडण्याची घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळावर निर्बंध घालण्याची मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krishi Samruddhi Yojana: निधी न दिल्यास रोष

Banana Farmers: खानदेशात डिसेंबर, जानेवारीत केळी लागवड अल्प राहणार

Pune APMC Mismanagement: शासनाकडून पणन संचालक, बाजार समितीची खरडपट्टी

Onion Export: भारताची कांदा निर्यातीत पीछेहाट

Cyclone Ditvah: ‘डिटवाह’ चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्याला इशारा

SCROLL FOR NEXT