Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme: राज्यात सुधारित पीकविमा योजना लागू

Revised Crop Insurance: राज्यात सुधारित पीकविमा योजना लागू करण्यात आली असून, ‘एक रुपयात विमा’ योजना बंद करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना ओळख क्रमांक आणि ई-पीक पाहणीसह ऑनलाइन अर्ज करून विमा हप्ता भरावा लागेल. खरीपसाठी अंतिम मुदत ३१ जुलै आहे.

रमेश जाधव

Pune News: एक रुपयात पीकविमा देणारी योजना बंद केल्यानंतर राज्य शासनाने सुधारित योजना जाहीर केली आहे. विमा काढण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक व ई-पीकपाहणी या गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, खरीप हंगामासाठी योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.

नवी योजना ‘खरीप हंगाम २०२५’ व ‘रब्बी हंगाम २०२५-२६’ या कालावधीसाठी असून शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक राहील. मात्र खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के तर दोन्ही हंगामांतील नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे. विम्याच्या भरपाईसाठी जोखिमस्तर ७० टक्के राहील.

अधिसूचित पिकाचे मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षे व त्याला गुणिले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेत उंबरठा उत्पादन निश्‍चित केले जाणार आहे. ही योजना ८०:११० या सूत्रानुसार राबविली जात आहे. त्यामुळे विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या ११० टक्के दायित्व स्वीकारतील.

विम्यासाठी कृषी विभागाने १२ जिल्हा समूह केले आहेत. या समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा भरपाईची रक्कम कमी असल्यास विमा कंपनी केवळ २० टक्के रक्कम स्वतःकडे ठेवू शकेल. महसूल मंडलात पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मंडलातील सरासरी उत्पादन काढण्यासाठी जिल्हापातळीवर किमान २४ पीक कापणी प्रयोग होतील. तालुक्याला १६, महसूल मंडळात १०, तर गावपातळीवर ४ पीक कापणी प्रयोग घेतले जातील.

Chart

अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

शेतकऱ्यांना खरीप हंगामात या योजनेत सामील होण्यासाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. रब्बीसाठी ज्वारीकरिता ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा, कांद्यासाठी १५ डिसेंबर तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत राहील. शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी बॅंकेत अर्ज द्यावा लागणार आहे.

Chart

विम्याचे जिल्हानिहाय कंत्राट घेतलेल्या कंपन्या व जिल्हे

भारतीय कृषी विमा कंपनी (पत्ता : मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९. ई-मेल pikvima@aicofindia.com)

जिल्हे : अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

SCROLL FOR NEXT