Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : भातशेतीवर अस्मानी संकट

Paddy Crop : विजांच्या कडकडाटाने आलेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला झोडपून काढले. पावसामुळे भातशेतीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Agrowon

Latest Agriculture News : विजांच्या कडकडाटाने आलेल्या अवकाळी पावसाने तालुक्याला झोडपून काढले. पावसामुळे भातशेतीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले भातपीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

ऐन दिवाळीत पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दिवाळी सण आल्याने भात कापणीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची कापणीची कामे थांबली होती. दिवाळी आल्याने मागील २ दिवसांपासून शेतकऱ्यांनी पुन्हा कापणीला सुरवात केली; मात्र शुक्रवारी (ता. १०) संध्याकाळी ७ वाजल्यापासून पावसाने हजेरी लावल्याने कापले भातपीक भिजले आहे.

यामुळे शेतकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विक्रमगड तालुक्यातील शीळ, ओंदे, आपटी, झडपोली, केव, म्हसरोळी, मलवाडा, दादडे, साखरे, कऱ्हे-तलावली, तलवाडा व विविध भागातील भात शेती कापणीसाठी तयार झाली आहे.

भात कापणीचा हंगाम जोरात सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात ठेवले आहे. दिवाळीपूर्वी पिवले सोने घरच्या अंगणात किंवा खळ्यावर नेऊन ठेवले जाते; मात्र अचानक आलेल्या परतीच्या पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कापलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली होती; मात्र कापलेले भात वाचवण्यासाठी चाललेली धडपड अपुरी पडली. अनेकांच्य भातशेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर अनेकांचे भात पीक पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला आले आहेत.पावसाच्या भीतीने कापणी केली नाही तर ते शेतातच वाया जाईल अशी भीती आहे. तर पीक कापले तर अवकाळी पावसाने त्याचे नुकसान होईल.

शेतकरी द्विधा मनस्थितीत

पावसामुळे भातपीक कापावे की कापू नये या द्विधा मन:स्थितीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे नेमके काय करावे? असा प्रश्न संकटग्रस्त शेतकऱ्याला पडला आहे. कापलेले भात पीक खराब होण्याची चिन्हे असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकाऱ्यांची दिवाळी ही शेतात पिकलेले भातपीक कापणी, झोडणीच्या कामात जात आहे.

भात उत्पादन व भाताचा पेंढा विकून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. या येणाऱ्या पैशातून दिवाळीत आपल्या मुलांसाठी कपडे, दिवाळीचे खरेदी करतात; मात्र ऐन दिवाळीतपावसाने शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहेत. त्यामुळे दिवाळी सण कसा साजरा करायचा? अशी चिंता शेतकऱ्याला सतावू लागली आहे.

तसेच भाताबरोबरच जनावरांसाठी लागणारी वैरणही कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा आर्थिक कोंडीत शेतकरी सापडला आहे. तसेच मात्र भात मळणी (झोडणी) न केल्याने या पावसामुळे भात भिजून खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्‍नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू

Fort Conservation: गड-किल्ले स्वच्छता, संवर्धन उपक्रमात युवकांचा सहभाग

Panand Road: राज्यात पाणंद रस्त्यांच्या हद्दी होणार निश्चित

Lumpy Skin Disease: बुलडाण्यात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात

Fake Officer Threat: सभापतींच्या कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याच्या धमकीने खळबळ

SCROLL FOR NEXT