Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहचली

Bharat Jodo Nyaya Yatra : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेने मंगळवारी (ता.१२) महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये प्रवेश केला. राज्यातील भारत जोडो न्याय यात्रेचा टप्पा नंदुरबारमधून सुरू होणार असून सांगता मुंबईत १७ मार्चला होणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेने मंगळवारी (ता.१२) महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये प्रवेश केला. आज दुपारी २.३० वाजता ही यात्रा जिल्ह्यात पोहचली. तर मुंबईत १७ मार्चला शिवाजी पार्क मैदानावरील सभेनंतर या यात्रेची सांगता होईल. त्यामुळे प्रदेश काँग्रेसकडून न्याय यात्रेच्या स्वागताची तयारी सुरू आहे.

दरम्यान भारत जोडो न्याय यात्रा आणि राहुल गांधी यांच्या सुरक्षेसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी (ता. ११) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली होती. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. तर भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण दिले आहे. सोमवारी (ता. ११) याबाबतचे निमंत्रण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, "राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा यांची यात्रा मंगळवारी (ता.१२) महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये प्रवेश करणार आहे. यानंतर धुळे, मालेगाव करून ही यात्रा ठाण्यात प्रवेश करेल. येथे चांदणी चौकात रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर राहुल गांधी चैत्यभूमीला देखील जाणार असल्याचे थोरात म्हणाले. तर १७ मार्चला शिवाजी पार्कवर सभा होणार असून यात महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीचे नेते सहभागी होतील. सध्या याचे निमंत्रण सर्व घटक पक्षांना दिले जात आहेत." अशी माहिती थोरात यांनी दिली.

भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग

भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर येथून १५ जानेवारी रोजी सुरू झाली आहे. न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. न्याय यात्रा ६७ दिवसांची निर्धारीत करताना १५ राज्ये, १०० जिल्ह्ये आणि ११० लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. महाराष्ट्रात यात्रा १२ ते १७ मार्च दरम्यान जाणार असून मुंबईत याची सांगता होणार आहे. मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करणारी न्याय यात्रा १३ मार्च धुळे, १४ मार्च नाशिक-पालघर आणि ठाणे करून १६ मार्चला मुंबईत दाखल होईल. तर १७ मार्चला शिवाजी पार्क मैदानावरील राहुल गांधी यांची सभा होईल. 

महिला अधिवेशन 

भारत जोडो न्याय यात्रा १३ मार्चला धुळ्यात पोहल्यानंतर येथे महिला अधिवेशन होणार आहे. तर या अधिवेशनास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत. याआधी सोनिया गांधी यांनी २०१० मध्ये म्हणजे १४ वर्षांपूर्वी नंदुरबारचा दौरा केला होता. यानंतर आता राहुल गांधी नंदुरबारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने असणार आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

Subsidy Fraud: अनुदान अपहारप्रकरणी सात कर्मचारी बडतर्फ 

Jal Jeevan Mission: सरकारकडून निधी न आल्याने ‘जलजीवन’ची बिले थकली

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

SCROLL FOR NEXT